आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा भगवान बुध्दांच्या पवित्र असिथसह आंतराष्ट्रीय बौध्द भिक्कु संघ ११० भिख्खु समावेश असलेल्या ऐतहासिक भव्य धम्म पदयात्रेचे बुधवार रोजी जालना शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. धम्म पदयात्रेचे आयोजक सिध्दार्थ हत्ती अंबीरे (प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस अनुसूचित विभाग) यांच्यासह सिनेअभिनेते गगन मलीक आणि भन्तेजींचे जालना जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद माजी नगरसेवक अजय भरतीय, विनोद रत्नपारखे, दिनकर घेवंदे, यांनी छत्रपती शिवाजी महराज पुतळा चौक येथे मान्यवरांचे शाल व पुष्पहार देवून स्वागत केले.
धम्म पदयात्रेचे नागेवाडी येथील नालंदा विहारात मुक्काम असून सकाळी यात्रा औरंगाबाद मार्गाने प्रस्थान करेल दिनांक १७ जानेवारी परभणी येथून सुरु झालेली पदयात्रा दिनांक १५ फेब्रुवारीरोजी चैत्यभुमी (दादर) मुंबई येथे पोहचणार आहे. पदयात्रेच्या पाउलो पावली देशाची सुख समृध्दी, आरोग्य समता, बंधुता आणि सामाजिक एैक्यासाठी धम्म देशना मंगल कामना करण्यात येणार असल्याचे संयोजक सिध्दार्थ हत्ती अंबिरे यांनी सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.