आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:पीएम स्वनिधी योजनेच्या दोन हजार चाळीस‎ लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट कर्जाचे वितरण‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची‎ संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली‎ होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत‎ आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची‎ आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा‎ परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय‎ करणाऱ्या फळे व भाज्या विक्रेत्यांना व‎ अन्य छोट्या व्यावसायिकांना अनेक‎ अडचणींचा सामना करावा लागला. ही‎ समस्या लक्षात घेवून केंद्र सरकारने‎ पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी‎ योजना सुरू केली. या पीएम स्वनिधी‎ योजनेचे मुख्य उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना‎ स्वावलंबी आणि सशक्त बनविणे हेच‎ आहे. रस्त्यावर छोटे व्यवसाय‎ करणाऱ्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा‎ लाभ घ्यावा व इतरांना लाभ घेण्यासाठी‎ प्रवृत्त करावे. तसेच पीएम स्वनिधी‎ योजनेच्या लाभार्थ्यांनी घेतलेल्या‎ कर्जाची परतफेड करुन बँकेत आपली‎ पत राखावी, असे आवाहन केंद्रीय‎ रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री‎ रावसाहेब दानवे यांनी केले.‎

पीएम स्वनिधी योजनेचा कर्ज ‍वितरण‎ मेळावा जालना शहरातील भोकरदन‎ नाक्यावरील भारती लॉन येथे बुधवारी‎ पार पडला. यावेळी ते बोलत होते.‎ याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय‎ राठोड, भास्करराव दानवे, उद्योजक‎ घनश्याम गोयल, सतिश घाडगे,‎ अशोक पांगारकर, राजेश राऊत,‎ रामेश्वर भांदरगे, बद्री पठाडे, देविदास‎ देशमुख, भागवत बावणे, स्टेट बँक‎ ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक‎ सुरज यामीनवार, महाराष्ट्र ग्रामीण‎ बँकेचे मुख्य व्यवस्थापक गणेश‎ कुलकर्णी, जिल्हा अग्रणी बँकेचे‎ व्यवस्थापक प्रेषित मोघे यांची प्रमुख‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपस्थिती होती.

दानवे म्हणाले की,‎ रस्त्यावरील छोटे व्यावसायिक‎ आत्मनिर्भर होण्यासाठी पीएम स्वनिधी‎ योजना केंद्रस्तरावरुन बँकेमार्फत‎ राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष‎ खांडेकर यांनी केले. तर आभार जिल्हा‎ अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रेषित मोघे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी मानले. मेळाव्यात पंतप्रधान‎ पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतील‎ लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात‎ धनादेशाचे वितरणही करण्यात आले.‎ या कार्यक्रमात भास्करआबा दानवे,‎ सुरज यामीनवार, कुलकर्णी, प्रेषित मोघे‎ आदींची समयोचित भाषणे झाली. या‎ कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध बँकेचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अधिकारी, नागरिक, पथविक्रेते, भाजी‎ विक्रेते, महिला व लाभार्थी मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते.‎

सात हजार व्यक्तींना फायदा
‎पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून‎ जालना जिल्ह्यात ७ हजार व्यक्तींना‎ लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या‎ टप्प्यात दहा हजार रुपये कर्ज दिले‎ जाईल त्याची परतफेड केल्यानंतर‎ दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये देण्यात‎ येतील आणि त्याची परतफेड‎ केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ५० हजार‎ रुपयांचे कर्ज देण्यात येईल. या सर्व‎ कर्जावर एकूण १० टक्के व्याज‎ आकारणीमध्ये शासन ७ टक्के व्याज‎ भरेल आणि केवळ ३ टक्के व्याज हे‎ प्रत्यक्ष लाभार्थ्यांने भरणे आवश्यक‎ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...