आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या गुणवंत विद्यार्थी घडवित असून सर्व क्षेत्रातील अनेक दिग्गज जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तयार झाले असल्याने विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात स्वतःचा चौफेर विकास करावा. असा सल्ला शिवसेना उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला युवा सेनेचे रवींद्र ढगे, सरपंच सुमित्रा ढगे, शालेय समिती अध्यक्ष मच्छिंद्र खळेकर, माजी सरपंच कालिंदा ढगे, उपाध्यक्ष गजानन ढगे ,मुख्याध्यापक एन. डी. सुतार यांची उपस्थिती होती. . यावेळी एस .पी.कुलकर्णी, एस. व्ही.आठवले, एल. सी.सावरकर, के. पी. क्षीरसागर, ए. एच. निंभोरे, ए. एस. रहाटे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.