आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. व जिल्हा क्षयरोग केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबर सकाळी १० वाजता बोरखेडी माळाचा गणपतीजवळ, सिंदखेडराजा रोड, जालना येथे क्षय रुग्णांसाठी कोरडा पोषण आहार किट वाटप करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने एकाच वेळी सर्व उपचाराखालील क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करणारा जालना हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. भारत सरकारने वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत “ कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेंशट ” हा उपक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार ३९१ क्षय रुग्ण उपचार घेत असून या क्षय रुग्णांना पोषण आहार देण्याकरिता विक्रम टी याऔद्योगिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांना एकाच वेळी पोषण आहार किट मिळणार आहे ही जालना जिल्ह्याच्या दृष्टीने फार मोठी बाब ठरणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, उद्योजक घनश्याम गोयल, सुनिल रायठठ्ठा यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे भावेशभाई पटेल, रमेशभाई पटेल यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील सीएसआर अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक संस्था, स्टील उद्योग, सिड्स कंपनी, कॉटन मिल्स, रॉटरी क्लब, लॉयन क्लब, अशासकीय संस्था व दानशुर व्यक्ती यांच्यामार्फत क्षयरुग्णांना कोरडा पोषण आहार देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आवाहन केले होते.
या आवाहनाला जालना जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील स्टील उद्योग, सिड्स कंपनी, कॉटन उद्योग, जालना आयएमए, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, विविध अशासकीय संस्था तसेच वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत अधिकारी -कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.