आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रातून योग्य दरात बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून दिली जातात का, याची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी गुरुवारी जालना तालुक्यातील मानेगाव येथील शुभम फर्टिलायझर या कृषी सेवा केंद्रास अचानक भेट देऊन तपासणी केली. दरम्यान, बियाणे व रासायनिक खते याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केले. राठोड म्हणाले, शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना बियाणे पाकिटे/खताच्या गोणीवरील किरकोळ कमाल विक्री किंमत पाहूनच खरेदी करावी. कृषी सेवा केंद्रचालकांनी योग्य दरात शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत. जादा दराने, रासायनिक खताबरोबर इतर विद्राव्य खते देण्याचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडून खरेदीची पक्की पावती घ्यावी. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे व रासायनिक खते आदी कृषी निविष्ठा चांगल्या प्रतीच्या व योग्य दरात उपलब्ध द्या. मानेगाव येथील कृषी सेवा केंद्रास अचानक भेट देऊन तपासणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.