आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बालविवाहाची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून (बुधवार, ८ मार्च) जागतिक महिलादिनी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, शासकीय व निमशासकीय आस्थापना आदी सर्वांनी बालविवाह निर्मूलनाची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
हुंड्याचा हाच पैसा मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात आणल्यास मुलगी स्वावलंबी होईल. मुलींवर अत्याचारही होणार नाहीत. बालविवाह होऊ नये यासाठी समाजाने मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा ८ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाने बालविवाह निर्मूलनाची शपथ घेण्याचे ठरवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.