आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीई कोट्यातून प्रवेश देणारी राखीव कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून शाळांच्या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांच्या अर्जांना सुरूवात झाली आहे. यावर्षी २ हजार २७३ जागांवर प्रवेश मिळणार आहेत. यासाठी नोंदणीला १ मार्च करण्यात आली असून आजपर्यंत चार हजारांवर अर्ज आले आहेत. अर्ज करण्यासाठी पालकांच्या हाती केवळ पाच दिवस बाकी राहिले आहे. वर्ष २०२३-२४ या वर्षी करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आरटीई प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन २३ जानेवारी २०२३ पासून सुरु केले. तर याला १० फेब्रुवारी रोजी ब्रेक देण्यात आला.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येतेे. त्यानुसार वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत काढून जालना जिल्ह्यात २९१ शाळांमध्ये २ हजार ७९५ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. वर्ष २०२३ - २४ साठी प्रक्रीया सुरू केली असून २८४ शाळांची १०० टक्के करण्याला यश मिळाले. तर यावर्षी २ हजार २७३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे.
पालकांचा प्रतिसाद
आरटीई कोट्यातील प्रक्रियेसाठी पालकांचा प्रतिसाद मिळत आहे. या कोट्यातून अर्ज करण्यासाठी अद्याप पाच दिवस हाती राहिले आहे. पालकांनी वेळेत प्रक्रीया पार पडल्यास पुढील कार्यवाही पुर्ण करण्यासाठी शिक्षण विभागही अॅक्शन मोडवर काम करणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.