आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. विजय चोरमारे यांना "दु:खी'' राज्य पुरस्कार घोषित‎

जालना‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल‎ ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त‎ ‎ विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू‎ ‎ शायर कै. राय हरिश्चंद्र‎ ‎ साहनी यांच्या‎ ‎ स्मृतिप्रीत्यर्थ दिला‎ ‎ जाणारा "दु:खी'' राज्य‎ ‎ काव्य पुरस्कार कोल्हापूर‎ ‎ येथील कवी, लेखक,‎ संपादक, चरित्रकार, डॉ. विजय चोरमारे‎ यांना जाहीर झाला. पुरस्काराचे हे रौप्य‎ महोत्सवी वर्ष आहे.

२५ हजार रुपये रोख,‎ स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.‎ गुढीपाडव्याला(२२ मार्च) सायंकाळी ६.३०‎ वाजता जे.ई.एस. महाविद्यालयाच्या‎ प्रांगणात //"कवितेचा पाडवा " या‎ गाजलेल्या कार्यक्रमात सिने-दिग्दर्शक‎ नागराज मंजुळे यांच्या हस्ते व ज्येष्ठ‎ लेखक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या प्रमुख‎ उपस्थितीत पुरस्कार वितरीत होणार आहे.‎

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत‎ संयोजक अभय साहनी, विनीत साहनी,‎ लेखिका, कवयित्री डॉ. संजीवनी‎ तडेगांवकर, अनुभव प्रतिष्ठानचे सचिव‎ पंडितराव तडेगावकर यांनी पुरस्काराची‎ घोषणा केली. पुरस्कार वितरणानंतर‎ नागराज मंजुळे व डॉ. विजय चोरमारे यांची‎ मुलाखत डॉ. संजय चौधरी (करमाळा)‎ आणि डॉ. संजीवनी तडेगावकर घेणार‎ आहेत. या वेळी दोन्ही मान्यवरांची सुरेल‎ काव्य मैफल तसेच कार्यक्रम स्थळी प्रसिद्ध‎ चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव)‎ यांच्या चित्रांचे प्रदर्शन पहावयास उपलब्ध‎ असेल, तरी रसिकांनी मोठ्या संख्येने‎ गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या‎ संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे‎ आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...