आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचे सुशोभीकरण:विद्रूप भिंती चित्रकृतींमुळे आता होणार‎ बोलक्या, दुभाजकांवर वृक्ष लागवड‎

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ जी-२० मुळे छत्रपती संभाजीनगर शहर एकीकडे‎ सुंदर व सुशोभित झाले असताना जालना शहरात‎ मात्र त्या तुलनेत सर्वत्र धुळीचे साम्राज्य आणि विद्रूप‎ झालेल्या पुलाच्या भिंती दिसत आहेत. हे चित्र आता‎ काही प्रमाणात का असेना बदलण्यास सुरुवात होत‎ आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध‎ भिंती रंगवण्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद‎ करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरात चार‎ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन निर्माण करण्यात येत‎ आहेत. पुढील चार महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण‎ होतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त‎ केला आहे.‎ छत्रपती संभाजीनगर शहरात जी-२० परिषदेच्या‎ निमित्ताने झालेला लक्षवेधी बदल आणि दुसरीकडे‎ जालना शहरातील परिस्थिती यासंदर्भात दै. दिव्य‎ मराठीने २५ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.‎ त्यानंतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या‎ जालनेकरांनी शहर स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी‎ प्रशासनाने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली‎ होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने काम सुरू केले‎ आहे. शहराच्या मुख्य भागात असलेल्या शासकीय‎ कार्यालयाच्या संरक्षक भिंती, सर्व ९ जलकुंभ आणि‎ काही प्रमुख ठिकाणी भिंतीवर स्वच्छतेचे संदेश‎ देणारे चित्र रेखाटण्यात येणार आहे. त्याशिवाय‎ उड्डाणपुलांचीही रंगरंगोटी करून त्यावरही असे संदेश‎ लिहिले जाणार आहेत. या कामासाठी २० लाख‎ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती‎ पालिका मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. हे‎ काम तातडीने सुरू केले जाणार आहे. त्याशिवाय‎ केंद्र सरकारच्या निधीतून केंद्रीय मंत्री रावसाहेब‎ दानवे यांच्या मदतीने शहरात चार ठिकाणी व्हर्टिकल‎ गार्डन निर्माण केले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी हे‎ काम पूर्ण केले जाणार आहे.‎

पावसाळ्यात वृक्षलागवड‎
मंठा चौफुली ते छत्रपती‎ संभाजीनगर रोडवर असलेल्या‎ विशाल कॉर्नर या बायपास रस्त्यावर‎ दुभाजकाच्या मध्ये वृक्ष लागवड‎ केली जाणार आहे. त्यासाठी‎ दुभाजकात काळी माती टाकण्याचे‎ काम दोन दिवसांपासून सुरू‎ करण्यात आले आहे. राष्ट्रीय‎ महामार्ग प्राधिकरणाने हे काम हाती‎ घेतले आहे. सध्या सर्व तयारी पूर्ण‎ करून पावसाळा सुरू होताच येथे‎ वृक्ष लागवड केली जाणार‎ असल्याचे कार्यकारी अभियंता‎ विक्रांत शिरभाते यांनी दिव्य‎ मराठीशी बोलताना सांगितले.‎

कुंडलिकाकाठी व्हर्टिकल गार्डन‎
शहरात कुंडलिका नदीच्या काठी चार ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंनी‎ व्हर्टिकल गार्डन निर्माण केले जाणार आहे. यात कुंडलिका नदीवरील‎ रामतीर्थ पुल, बसस्थानकाजवळचा सीना नदीवरील पूल, देहेडकरवाडी‎ येथील पूल आणि मंमादेवी मंदिराजवळ असलेल्या पुलाची निवड‎ करण्यात आली आहे. ही चारही उद्याने तयार झाली तर शहर सुशोभित‎ करण्याच्या प्रयत्नाचा तो प्रमुख टप्पा ठरणार आहे.‎

पावसाळ्यात बदल दिसेल‎
शहरातील प्रमुख सार्वजनिक भिंती, पूल आणि जलकुंभ याची रंगरंगोटी‎ आपण करणार आहोत. या कामासाठी २० लाखांची तरतूद केली आहे.‎ अन्यही काही कामे शहरात होत आहेत. साधारणपणे तीन महिन्यांत ही‎ कामे पूर्ण झालेली असतील. पाऊस पडल्यानंतर आपल्याला यात चांगला‎ बदल झालेला दिसेल.‎ - संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका‎

बातम्या आणखी आहेत...