आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेशन वरील धान्य बंद करून लाभार्थींच्या बँक खात्यावर ठराविक रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे.शासनाच्या या निर्णयाचा फटका ग्रामीण भागातील शेतमजूर,कामगार, गरीब जनता यांना बसणार आहे. महागाईच्या या युगात मजुरांना उपाशी ठेवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप करत शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथे गुरुवारी अन्न अधिकार दुरडी मोर्चा काढण्यात आला. बाबूलतारा आणि परिसरातील अनेक शेतमजूर, कामगार महिला हातात दुरडी घेऊन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
सुरुवातीच्या काळात स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी सरकारने बँक खात्यावर जमा केली. आज ही सबसिडी बंद होऊन गॅसचे दर दुपटीपेक्षा जास्त वाढले आहेत. तशीच अवस्था रेशनच्या सबसिडीची होणार असल्याचा आरोप करत मोर्चात सहभागी महिलांनी सरकारच्या या निर्णया विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रेशन धारक कुटुंबांना खात्यावर अनुदान देण्याऐवजी दरमहा ३५ किलो धान्य वाटप करावे, पत्र्याचे शेड व पत्र्याचे घर असणाऱ्या मजूर कुटुंबांना घरकुल वाटप करावे आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.