आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या वीज पंपाची चोरी होत असल्याने शेतकऱ्यावर संकटांची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अगोदरच कापसाला भाव मिळत नसल्याने कापूस घरात पडून आहे, ऊसाला तोड मिळत नाही, ऐन पिकाला पाणी देण्याच्या वेळेसच वीज कट करण्याचा उद्दामपणा वीज वितरणकडून सुरू आहे, कशीबशी इकडून तिकडून वीज जोडून घेत विजपपं सुरू करून पिकाला पाणी देत असतांना चोरट्यांनी डाव साधत विजपपं चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू झाली .
सध्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडले असल्याने कालव्याचे पाणी शेतातील पिकांना देण्यासाठी दहीगव्हाण येथील शेतकरी विष्णू दहिभाते या शेतकऱ्याने डाव्या कालव्यावर वीज पंप बसवला असून त्यांच्या वीज पंपाची रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबद विष्णू दहिभाते या शेतकऱ्याने गोंदी पोलीस ठाणेअंतर्गत तीर्थंपुरी पोलीस चौकीला चोरीची तक्रार दिली आहे. कालव्यावरील विजपंपाची चोरी होत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. पोलिसांनी चोरीचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.