आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम-२०१३ व महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी काम करीत असतील, त्या प्रत्येक आस्थापनेत तक्रार निवारण समितीची तातडीने स्थापना करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड यांनी केले आहे. तक्रार निवारण समिती स्थापन केली नसल्यास ५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
तरी ज्या आस्थापनेत १० किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी काम करीत असतील, अशा सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, रुग्णालये, हॉटेल्स, औद्योगिक आस्थापना, करमणुकीची ठिकाणे, महामंडळे यांनी त्यांच्या आस्थापनेत तक्रार निवारण समिती स्थापन करावी. जर यापूर्वीच समिती स्थापन केलेली असेल व समितीस ३ वर्ष झाली असतील तर या समितीची तात्काळ पुनर्रचना करावी. संबंधित आस्थापनांनी जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जुन, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर याप्रमाणे महिना संपल्यानंतर आठ दिवसांच्या आत विहित नमुन्यातील अहवाल जालना येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास ई मेलव्दारे govtlabour.officer52 @gmail.com सादर करावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.