आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींना उजाळा‎:नेर प्रशालेतील माजी विद्यार्थी‎ आले 30 वर्षांनंतर एकत्र‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद‎ माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीतील‎ १९९३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी नुकतेच‎ एका स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र‎ आले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा‎ दिला. यावेळी गुरुजनांचाही सत्कार‎ करण्यात आला.‎ यावेळी बापुसाहेब कुलकर्णी,‎ शिवणगिरीकर, वाघ, शिंदे, खान, पाटील,‎ डाखोरकर, पवार, प्रा. रंगनाथ खेडेकर,‎ पेरके आदींची उपस्थिती होती.

यावेळी‎ प्रा.लक्ष्मण गादगे, फिरोज खान, शिवनाथ‎ खेडेकर, सुभाष राठोड, रचना लाहोटी,‎ विद्या वाघ, संजय राठोड, महावीर कुरकुटे‎ आदींनी मनोगतात जुन्या आठवणींना‎ उजाळा दिला. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना‎ प्रा. रंगनाथ खेडेकर म्हणाले, संघर्ष आणि‎ संस्कारातून निर्माण झालेली ही पिढी येणारे‎ आव्हाने स्विकारण्यास समर्थ आहे. या‎ शाळेने दिलेले संस्कार ते आपल्या‎ दररोजच्या जीवनात आचरणात आणतात‎ म्हणून आज ते यशस्वी जीवन जगत आहेत‎ यावेळी माजी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन‎ गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन संजय‎ टकले यांनी तर अंकुश राठोड यांनी आभार‎ मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी‎ अशोक जैस्वाल, माधव चव्हाण, विठ्ठल‎ भुतेकर, प्रकाश कुलकर्णी, विठ्ठल खलसे,‎ डॉ. सुभाष जाधव, शैलेश बजाज, अंकुश‎ चव्हाण सुभाष शिंदे, एकनाथ पवार, सरिता‎ गिरी, रेखा देवमुरारी, संगीता चव्हाण,‎ दगडाबाई लगडे, भगवान, हिवाळे,‎ हनीफभाई, भिमराज राठोड, विलास‎ सहाने, जानुजी चोरमारे, सुनील जाधव,‎ पंढरीनाथ भुतेकर, संभाजी गादगे,‎ नंदकिशोर कारेगावकर, संतोष‎ कारेगावकर, कुलभ्ूषण उखळकर आदींनी‎ परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची‎ सांगता करण्यात आली. यावेळी माजी‎ विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...