आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सावकाराच्या त्रासामुळे‎ शेतकऱ्यांची आत्महत्या‎

अंबड/जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजाच्या पैशांची वारंवार मागणी‎ करत मारहाण करून जिवे‎ मारण्याची ‎धमकी ‎दिल्यामुळे ३०‎ वर्षीय ‎शेतकऱ्याने ‎विहिरीत उडी‎ घेऊन ‎आत्महत्या‎ केली. अंबड तालुक्यातील‎ पागीरवाडी शिवारात ९ मार्च रोजी ही‎ घटना घडली. भारत काळे असे‎ मृताचे नाव आहे.‎ याप्रकरणी मृताची पत्नी उषा‎ काळे यांनी शनिवारी दिलेल्या‎ तक्रारीवरून शिवाजी भोजने,‎ कुंडलिक शिवाजी भोजने, रख्माजी‎ कुंडकर व केकेबाबा भोजने‎ यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ गत आठवड्यात शनिवारी भारत‎ काळे यांना नमुद आरोपींनी घरी‎ येऊन झोपेतून उठवून दुचाकीवर‎ बसवून नेले होते.

यावेळी विचारपूस‎ केली असता, तुझ्या नवऱ्याने‎ आमच्याकडून व्याजाने ३५ हजार‎ रुपये घेतले आहे. जोपर्यंत पैसे देत‎ नाही, तोपर्यंत त्याला सोडणार नाही‎ असे म्हणून भारत यांना ओढत‎ चापट-बुक्याने मारहाण करत‎ घराबाहेर ओढत नेले. सोडवण्यास‎ गेले असता, चापटबुक्याने मारहाण‎ करुन ढकलून दिले. सायंकाळी ६.३०‎ वाजता सुमारास घरी आल्यावर‎ नमुद आरोपी पैशासाठी त्रास देत‎ असल्याची आपबीती त्यांनी‎ सांगितली होती. याच त्रासाला‎ कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची‎ तक्रार पत्नी उषा यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...