आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी‎:शेतकऱ्यांना तातडीने भरपाई‎ द्यावी ;विरोधी पक्षनेते दानवे‎

बदनापूर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार एकीकडे आपले लोक आणि सरकार‎ वाचवण्यात व्यस्त आहे. मात्र, शेतकरी‎ अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे.‎ हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून‎ घेतला आहे. रब्बीतील सर्वच पिकांना बेमोसमी‎ पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानीचा‎ महसुली यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे करून‎ शासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई‎ द्यावी, अशी मागणी विधिमंडळात करणार‎ असल्याचे विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते‎ अंबादास दानवे यांनी सांगितले.‎ शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते‎ अंबादास दानवे यांनी बदनापूर तालुक्यातील‎ धोपटेश्वर येथे अवकाळी पावसामुळे नुकसान‎ झालेल्या शेतकरी श्रीकृष्णा शेळके यांच्या‎ शेतात जाऊन नुकसानीची पाहणी‎ केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर‎ आंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे,‎ उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, तालुकाप्रमुख‎ जयप्रकाश चव्हाण, तालुकाप्रमुख अशोक‎ पाटील बर्डे, अशोकराव शिंदे, तालुका संघटक‎ नंदकिशोर दाभाडे, पद्माकर पडूळ, युवासेना‎ उपजिल्हाप्रमुख बळीराम मोरे, उपसभापती रवी‎ बोचरे, तहसीलदार सुमन मोरे, पोलिस निरीक्षक‎ शिवाजी बंटेवाड, मंडळ अधिकारी तलाठी‎ सुनील होळकर यांच्यासह गणेशराव शिरसाट‎ दत्तू ननवरे, सुभाष अडसूळ, हरिभाऊ‎ नाईकवाडे, संभाजी सोनवणे, अर्जुन मोरे,‎ ताराचंद फुलमाळी, कैलास दाभाडे, गणेश‎ शेळके, शहाजी शेळके आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...