आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:मराठा आरक्षणावर तातडीने‎ सकारात्मक तोडगा काढा‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या‎ विषयावर २७ जानेवारी रोजी‎ वडीकाळ्या ग्रामस्थ आणि मनोज‎ जरांगे पाटील यांच्यादरम्यान चर्चा‎ झाली. मात्र, या चर्चेदरम्यान मराठा‎ आरक्षणाबद्दल कुठलाही तोडगा‎ निघाला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री‎ शिंदे यांनी ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा‎ बैठक घेतली. मात्र, त्यातही‎ कोणताच तोडगा निघाला नसून ही‎ बैठकही वांझोटी ठरली. त्यामुळे‎ सरकारने मराठा आरक्षणावर‎ तातडीने सकारात्मक तोडगा‎ काढावा, अशी मागणी मराठा क्रांती‎ मोर्चाचे समन्वयक डॉक्टर संजय‎ लाखे पाटील यांनी केली आहे.‎ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी‎ मनोज जरांगे पाटील आणि काही‎ तरुणांनी बेमुदत उपोषण सुरू केले‎ आहे. या आंदोलनात मनोज जरांगे‎ पाटील किंवा ग्रामस्थ एकटे नसून‎ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल‎ मराठा समाज हा वडीकाळ्या‎ ग्रामस्थांच्या बरोबर आहे. या‎ आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा,‎ सकल मराठा समाज आणि मराठा‎ समाजाच्या विविध सामाजिक‎ संघटना सहभागी होणार आहेत.

या‎ वेळी जगन्नाथ काकडे, मराठा‎ महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देशमुख, अशोक पडूळ, संभाजी‎ ब्रिगेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष संतोष‎ गाजरे, राजेंद्र दाते पाटील, चंद्रकांत‎ भराड, शरद देशमुख, माउली‎ कदम, संदीप ताडगे, सदाशिव‎ भुतेकर, योगेश पाटील, राम‎ कुऱ्हाडे, पंकज जऱ्हाड, राम‎ सावंत, रमेश गजर, कृष्णा पडूळ‎ आदींची उपस्थिती होती.‎

औरंगाबादला गाेलमेज‎ परिषदेचे करणार आयोजन‎ मराठ्यांना कायमस्वरूपी आरक्षण,‎ मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी‎ प्रमाणपत्रे, जातीनिहाय जनगणना,‎ छत्रपती शिवाजी महाराजांचे‎ राजभवनामध्ये भव्य स्मारक,‎ कोपर्डीच्या भगिनींना न्याय आदी‎ प्रमुख मागण्यांसंदर्भात समाजाचा‎ लढा तीव्र करण्यासाठी लवकरच‎ औरंगाबाद येथे राज्यव्यापी गोलमेज‎ परिषद आयोजित करून‎ वडीकाळ्या ग्रामस्थांच्या‎ आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातून‎ सक्रिय पाठिंबा देण्यासाठी नियोजन‎ करण्यात येणार असल्याचे डॉ.‎ संजय लाखे पाटील यांनी सांगितले.‎ वेळप्रसंगी राज्यभर तीव्र‎ आंदोलनदेखील छेडले जाईल,‎ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे‎ राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे‎ पाटील यांनी दिला.‎

बातम्या आणखी आहेत...