आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरकोळ कारणावरून मध्यरात्री रोडवर टवाळखोरांनी धुडगूस घातल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या टवाळखोरांकडून कचेरी रोडवर दोघांना मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत चौघांना अटक केली आहे. २८ फेब्रुवारी रोजी लग्न समारंभ आटोपून रात्री संदीप लिंगायत आणि अक्षय गवळी हे घराकडे जात होते. त्या वेळी कचेरी रोडवर पाच ते सहा जण उभे होते. या वेळी किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर त्यांनी या दोघांवर हल्ला केला.
दोघांना पाच ते सहा जणांनी फिल्मीस्टाइल मारहाण केली. या मारहाणीत दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी संदीप लिंगायत यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात कदीम जालना पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चौघांना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मजहर, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, सय्यद खलील, रामेश्वर राऊत, संदीप चव्हाण, अजीम अन्सारी यांनी केली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींवर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.