आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी घटना उघडकीस‎:मोती तलावात चार टन‎ मासे मृत, नमुने घेतले‎

जालना‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोती तलावातील मासे मृत पावल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. महाराष्ट्र प्रदूषण ‎नियंत्रण मंडळाने या प्रकाराची दखल घेतली‎ असून त्यांनी मृत माशांचे नमुने तपासणीसाठी‎ घेतले आहेत, तर दुसरीकडे पालिकेने शनिवारी‎ सर्व मासे गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. जवळपास चार टन मासे मृत पावल्याचे समोर‎ आले आहे.‎ शहरातील मोती तलावाच्या पाण्यावर मृत मासे‎ तरंगत आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस‎ आला होता. या प्रकाराने एकच खळबळ उडाली.‎ पालिकेने याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण‎ मंडळाला दिली. त्यानंतर मंडळाच्या‎ अधिकाऱ्यांनी मोती तलावाची पाहणी करून मृत‎ माशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मासे‎ तपासणीसाठी घेत असतानाच मंडळाने मोती‎ तलावाची पाहणी केली. यात प्रथमदर्शनी त्यांना‎ कोणत्या मार्गाने प्रदूषण झाले याची माहिती मिळू‎ शकली नाही. मात्र माशांचे नमुने तपासल्यानंतर‎ मासे कशामुळे मृत पावले हे लक्षात येणार आहे.‎

दुसरीकडे जालना नगरपालिकेच्या स्वच्छता‎ विभागाने शनिवारी सकाळी सर्व मासे एकत्र‎ करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली.‎ दरम्यान, शनिवारी नव्याने मासे मृत पावल्याचा‎ प्रकार घडलेला नाही अशी माहिती पालिकेच्या‎ स्वच्छता विभागातून देण्यात आली. दुसरीकडे‎ मोती तलावात वाहने धुण्याचा आणि कपडे‎ धुण्याचा प्रकार शनिवारीही सुरूच होता. त्यामुळे हे‎ तातडीने थांबवण्यात यावे अशी मागणी‎ पर्यावरणप्रेमींनी केली आहे.दरम्यान, मोती‎ तलावातून शनिवारी स्वच्छता विभागाने मृत मासे‎ एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली. हे मासे‎ जवळपास चार टन होते.‎

मृत मासे पालिकेत टाकू‎ शहरातील मोती तलावात मृत मासे वरती काढून‎ नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ते गांधीनगर‎ रेल्वे उड्डाणपुलाखाली उघड्यावर आणून टाकले.‎ हा मुक्या प्राण्यांसह नागरिकांच्या जीविताशी‎ खेळण्याचा प्रकार असून या माशांची तात्काळ‎ योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्यास थेट पालिकेत‎ आणून टाकू, असा इशारा अमजद खान यांनी‎ दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...