आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:कांद्याला तीन हजारांचा‎ भाव द्या अन्यथा आंदोलन‎

जालना‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव‎ देण्यात यावा नसता तर राज्यभरात‎ आंदोलन करणार असल्याचा इशारा‎ रासपा च्या वतीने‎ जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे‎ देण्यात आला आहे.‎ यावर्षी राज्यात कांद्याचे उत्पादन‎ चांगले झाले आहे. त्यामुळे‎ बाजारपेठेत आवक चांगली आहे.‎ परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा‎ मातीमोल भावाने विकला जात‎ आहे. शेतकऱ्यांना कांदा‎ पिकवण्यासाठी प्रति क्विंटल १५००‎ रूपये खर्च येतो. परंतु, बाजारात‎ ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने‎ कांदा विकला जातो आहे.

यामुळे‎ शेतकरी कर्जबाजारी होणार आहे.‎ तरी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना‎ प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान‎ देण्यात यावे, यापुढे कांद्याला‎ प्रतिक्विंटल ३ हजार रूपये हमीभाव‎ देण्याचा शासनाने निर्णय घ्यावा,‎ अन्यथा आमदार महादेव जाणकर‎ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात‎ येईल, असा इशारा रासपा नेते‎ ओमप्रकाश चितळकर, विनोद‎ मावकर, पुंजाराम खर्जुले आदींनी‎ दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...