आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मेळावा:दु:खी शेतकऱ्याने पिकवलेले अन्न खाणाराही आजारी‎ पडताे; नेहमी शेतकऱ्यांचे अश्रू पुसा, त्यांना दुखवू नका‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत‎ वाटूर येथे गुरुवारी अाध्यात्मिक शेतकरी मेळावा झाला.‎ याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत,‎ माजी मंत्री बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर आदींची‎ उपस्थिती होती. याप्रसंगी श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते २४५‎ गावांत हाती घेण्यात आलेल्या जलसंधारणाच्या जलतारा‎ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री श्री‎ रविशंकर यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.‎

कसे आहात,‎ जालन्याच्या मातीत वेगळीच ऊर्जा आहे.‎ २०१० मध्ये एका कार्यक्रमादरम्यान लोकांना‎ स्वच्छ जालनाचे आवाहन केले होते.‎ दुसऱ्या दिवशी हजारो हात शहराच्या‎ स्वच्छतेसाठी सरसावले होते. २०१५ मध्ये‎ भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत‎ योजनेची सुरुवात खऱ्या अर्थाने २०१० मध्ये‎ जालन्यात झाली होती.‎ आज जलतारादेखील जालन्यातून सुरू‎ होत आहे.

पूर्ण देशात तो पोहोचेल यात‎ शंका नाही. शेतकऱ्यांचे अश्रू खूप‎ खतरनाक असतात. डोळ्यात अश्रू घेऊन‎ जो शेतकरी शेती करतो अन् त्यातून जे‎ अन्न पिकवतो ते पिकवलेले अन्न‎ खाणाराही आजारी पडतो. शेतकरी दुःखी‎ असता कामा नये. कधीच कोणत्या‎ शेतकऱ्याने आत्महत्या करायला नको.‎ यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची‎ गरज आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या‎ आत्महत्या थांबाव्यात यासाठी आर्ट ऑफ‎ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी ५२० गावांमध्ये‎ पदयात्रा केली. घराघरात जाऊन‎ शेतकऱ्याला ‘तुम्ही एकटे नाहीत, चिंता‎ करू नका. आपल्या मनात विश्वास कायम‎ ठेवा. जीवनात सुख-दुःखे येत असतात.‎ कोणाला नाही झाले दुःख? सगळ्यांना‎ कधी ना कधी कठीण काळाचा सामना‎ करावाच लागतो,’ असे समजावले.‎ आज इथे आलात, आपले दुःख इथेच‎ सोडून हसत हसत परत जा. मी प्रत्येक‎ बाबीत पुढे जाईल आणि यशस्वी होईल या‎ आत्मविश्वासाने आपण पुढे गेले पाहिजे.‎ आपल्या सर्व चिंता इथेच सोडून एक नवे‎ चिंतन घेऊन आपण जायला हवे. चिंता‎ करू नका, चिंतन करा.‎ मन प्रसन्न असेल तर शरीर अधिक‎ मजबूत राहते. यासाठी ध्यान आवश्यक‎ आहे.

भारत सरकार आणि आर्ट ऑफ‎ लिव्हिंगच्या मदतीने ‘हर घर ध्यान’ची एक‎ योजना आगामी काळात येऊ घातली आहे.‎ ध्यान करा आणि मानसिक रोगांपासून मुक्त‎ राहा. जीवन क्षणभंगुर आहे. हसतमुखाने‎ आपण जगले पाहिजे. जीवनात रडत‎ रडतच तर आलो आहोत, मात्र रडत रडत‎ जायचे नाही असा संकल्प आपण करायला‎ हवा. जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा‎ आपण रडत होतो आणि लोक आनंदाने‎ हसत होते. जेव्हा आपण या जगातून‎ जाणार तेव्हा आपण हसत जावे आणि‎ लोकांनी रडायला हवे. तेव्हाच खऱ्या‎ अर्थाने आपण जीवन जगलो असे म्हणता‎ येईल.

हीच खरी जीवन जगण्याची कला‎ आहे.‎ आपल्या गावाला आदर्श गाव‎ बनवण्यासाठी आपसातील मतभेद‎ सामोपचाराने मिटवा. छोट्या छोट्या‎ गोष्टीवरून अनेक खटले आज चालू‎ आहेत. माणसाचे जीवन संपून जाते, मात्र‎ कोर्टातल्या केसेस काही केल्या संपत‎ नाहीत. गावातले तंटे गावातच सोडवले‎ गेले पाहिजेत. वाद मिटवण्यासाठी‎ मध्यस्थाची भूमिका आपण घेतली पाहिजे.‎ आपला गावाला आदर्श आणि श्रेष्ठ गाव‎ बनवण्याचा संकल्प करा. नैसर्गिक शेती‎ करा, स्वदेशी वस्तूंचा वापर करा. भारताला‎ एक बाजारपेठ म्हणून जग पाहते. भारताची‎ ही ओळख बदलून उत्पादक आणि‎ निर्यातदार अशी करण्यासाठी आपल्याला‎ प्रयत्न करायचे आहेत. आपण कोणत्याच‎ क्षेत्रात कमी नाहीत. अध्यात्म, योग, उद्योग‎ आणि निष्ठा यांच्या माध्यमातून जीवनाला‎ समजसेवेशी जोडून चालल्यास जीवन‎ निश्चित एक उत्सव होईल.‎ शब्दांंकन : आशिष गारकर, परतूर‎

बातम्या आणखी आहेत...