आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याच्या समस्या:बदलत्या वातावरणामुळे‎ वाढल्या आरोग्याच्या समस्या‎

वाकडी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ भोकरदन तालुक्यातील वाकडी आणि‎ परिसरात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ‎ वातावरण, मध्येच झालेला अवकाळी पाऊस‎ व बदललेल्या हवामानामुळे नागरी‎ आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ढगाळ‎ व दमट हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारीत‎ वाढ झाली आहे. सतत बदलणाऱ्या‎ वातावरणामुळे अनेक भागात गारवा वाढला‎ आहे. तसेच, या वातावरणामुळे रुग्णसंख्येत‎ वाढ झाली आहे. सध्या अनेक गावांमध्ये‎ सर्दी, खोकल्याबरोबरच दमा तसेच हात-पाय‎ दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत‎ आहे.‎

भोकरदन तालुक्यातील वाकडी परिसरात‎ ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे‎ शेतकऱ्याची धावपळ होत होती. आता‎ अचानक ढग आल्याने चिंतेचे ढग गडद झाले‎ आहेत.यामुळे भाजीपाला व इतर पिकांचा‎ हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची‎ शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे‎ नुकसानीच्या भीतीने बळीराजा अधिक‎ प्रमाणात धास्तावला आहे. आरोग्याच्या‎ समस्या वाढल्या अषून बदलत्या‎ वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत‎ आहे.

शनिवार रोजी सकाळपासून गारवा‎ जाणवत असल्याने आजार बळावत आहेत.‎ विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली‎ लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला‎ यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे.‎ दररोज रुग्णालयांमध्ये ओपीडीमध्ये रुग्ण‎ सर्दी, खोकला आणि इतर आजारांचे रुग्ण‎ वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...