आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णमहोत्सव:हिसोडा फाटा ते लेहा रस्त्याला सुवर्णमहोत्सवी तपानंतर झळाळी‎

पिपळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेणुकाई‎ मागील ५० वर्षापासून दुर्लक्षीत व‎ धुळखात पडून असलेल्या विदर्भ व‎ खान्देशाला जोडल्या जाणारा हिसोडा‎ फाटा ते लेहा या तीन किलोमीटर‎ रस्त्याचे भाग्य आमदार संतोष दानवे‎ यांच्या पुढाकारातुन उजाळणार आहे.‎ आमदार संतोष दानवे यांनी शनिवारी‎ सदर रस्त्याची पाहणी करीत लेहा व‎ हिसोडा गावातील ग्रामस्थांशी संवाद‎ साधुन येणाऱ्या काही दिवसात तत्काळ‎ या रस्त्यावर डाबरीकरणाला सुरूवात‎ होणार आहे. दरम्यान, हिसोडा फाटा ते‎ लेहा रस्त्याला सुवर्ण महोत्सवी‎ तपानंतर झळाळी मिळणार असल्याचे‎ म्हणने वावगे ठरणार नाही.‎

भोकरदन तालुक्यातील लेहा व‎ हिसोडा फाटा हा रस्ता ३ किलोमीटर‎ अंतराचा आहे. दरम्यान आन्वा,‎ जळगाव सपकाळ, हिसोडा, लेहा,‎ शेलुद, पारध खुर्द या भागातील‎ नागरिकांना खान्देशात व विदर्भात‎ जाण्यासाठी हा मार्ग शाँर्टकट आहे.‎ मात्र सदर रस्ता तब्बल १९७२ पासून‎ तसाच पडून आहे. त्यामुळे या‎ भागातील ग्रामस्थांना रस्त्यावर प्रवास‎ करताना विविध अडचणीचा सामना‎ करावा लागत असे.

या रस्त्यावर‎ बैलगाडी तर सोडा साधे माणसाला‎ देखील पायी चालणे अवघड आहे.‎ दरम्यान शेती विकासाच्या दृष्टीने हा‎ रस्ता अतिशय महत्त्वाचा असल्याने या‎ रस्याचे काम करण्यात यावे म्हणून‎ शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे‎ निवेदने देखील सादर केली होती. मात्र,‎ त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने‎ अखेर शेवटी येथील शेतकऱ्यांनी‎ एकञ येत मागील काही दिवसापुर्वी‎ आमदार संतोष दानवे यांची भेट घेत‎ आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या.‎ दळणवळण व शेती विकासाच्या‎ दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा असल्याने‎ आमदार संतोष दानवे यांनी हा रस्ता‎ पूर्ण करण्याचे आश्वासन या भागातील‎ नागरिकांना दिले होते.

त्यानुसार‎ शनिवारी खुद्द आमदार दानवे यांनी‎ रस्त्याची पाहणी करीत या भागातील‎ शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत‎ येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामाला‎ सुरूवात करणार असल्याचे सांगितले.‎ शिवाय या भागातील नागरिकांनी‎ देखील रस्त्याचे काम पूर्ण झाले तर‎ आमचे पांग फिटेल अशा प्रतिक्रिया‎ यावेळी व्यक्त केल्या. या भागातील‎ सर्वच रस्त्याची पाहणी दानवे यांनी‎ यावेळी केली. गेल्या अनेक वर्षापासून‎ प्रलंबीत असलेल्या रस्ता कामाला‎ एकदमच सुरूवात होणार असल्याने या‎ भागातील शेतकऱ्यांच्या आशा‎ पल्लवीत झाल्या आहे.

या पाहणी‎ प्रसंगी माजी जिप सदस्य सुभाष‎ देशमुख, डाॅ. हेमंत सपकाळ, बन्कु‎ सपकाळ, भाजपा जेष्ट नेते मोतीराम‎ नरवाडे, सरपंच अशोक सोनुने, सरपंच‎ शरद बारोटे, रामेश्वर लक्कस,‎ संग्रामसिग राजपुत, विजयसिंग‎ राजपुत. बाबुराव बेराड, हरिभाऊ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहेर, अजय देशमुख, ज्ञानेश्वर‎ देशमुख, रामेश्वर देशमुख आदींची‎ उपस्थिती होती. पावसाळ्यात या‎ रस्त्यावर चालताना शेतकऱ्यांना‎ गुडघाभर चिखलातुन प्रवास करावा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लागत होता. तसेच हा रस्ता खडतर‎ असल्याने अनेक वेळा या रस्त्यावर‎ अपघात देखील घडले आहे. या‎ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात‎ मिरचीचे उत्पादन घेतो.‎

बातम्या आणखी आहेत...