आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुजरातेतील थंड वारे दाखल झाल्याने हुडहुडी‎

जालना‎3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातकडून थंड वारे प्रति ११‎ तासांच्या वेगाने राज्यात दाखल‎ झाल्याने थंडी अधिकच वाढली‎ आहे. मागील महिनाभरातील‎ गरमीच्या वातावरणानंतर‎ जानेवारीच्या पहिल्याच‎ आठवड्यात थंडी वाढली आहे.‎ विशेष म्हणजे कमाल तसेच किमान‎ दोन्हीही तापमानात कमालीची घट‎ तसेच चढउतार होत असल्याने‎ वातावरणही झपाट्याने बदलत‎ आहे. सोमवारी (९ जानेवारी)‎ किमान तापमान १० अंशांवर जाणार‎ असल्याचा अंदाज हवामान‎ खात्याने वर्तवला आहे.‎ औरंगाबादेत तापमान ९ अंशावर‎ खाली उतरले आहे.

मात्र, उद्योगाची‎ नगरी असलेल्या हॉट सिटी‎ जालन्यातही थंडीचे प्रमाण तुलनेने‎ चांगलेच राहिले आहे. बुधवारी‎ जालन्यात तापमानाचा कमाल पारा‎ तीन अंशांनी घसरून २७ अंशांवर‎ पोहोचला, तर किमान तापमान १६‎ राहिले होते. पाणी साठवणीचे‎ प्रकल्प तसेच बागायती परिसर‎ असलेल्या भागात थंडी अधिक‎ राहिली. जिल्ह्यातील आठही‎ तालुक्यांतील तापमानात तफावत‎ होती.

जाफराबाद, भोकरदन,‎ घनसावंगी, अंबड या तालुक्यातील‎ तापमान जालन्याच्या तुलनेत एक ते‎ दीड अंशाने अधिकच घसरल्याची‎ नोंद झाली. थंड हवा तब्बल ११‎ किमी प्रतितासाचा वेग घेत‎ आपल्याकडे दाखल होत आहे.‎ यामुळे अचानक ३ जानेवारीपासून‎ तापमानात मोठा बदल झाला.‎ नववर्षाच्या सुरुवातीला थंडी‎ राहणार नाही, असा अंदाज‎ वर्तवण्यात आला होता. मात्र, ३‎ तारखेनंतर वातावरणात बदल‎ झाला. मागील दोन दिवसांपासून‎ सूर्यदर्शन तब्बल नऊ ते साडेनऊ‎ वाजेनंतर होत असल्याचे‎ नागरिकांनी अनुभवले आहे. ही‎ स्थिती पुढील पाच दिवस म्हणजेच‎ ९ जानेवारी रोजीपर्यंत कायम‎ राहणार असून, थंडीत मोठी वाढ‎ होणार असल्याचा अंदाज आहे.‎

ढगाळ वातावरण धोक्याचे‎
रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू तसेच हरभरा‎ पिकांची लागवड या वर्षी मोठ्या प्रमाणात झाली‎ आहे. हरभरा, गहू हे पीक थंडीच्या दिवसांतच‎ चांगल्या प्रमाणात वाढते. तापमान अधिक‎ राहिल्यास पिकांचे उत्पादन घटते.

बातम्या आणखी आहेत...