आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होणे अशक्यच‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण ही काळाची गरज आहे,‎ शिक्षणाशिवाय माणूस प्रगती करू‎ शकत नाही जर जीवनामध्ये‎ यशस्वी व्हायचे असेल आणि एक‎ चांगला माणूस घडायचा असेल तर‎ शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे‎ पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे‎ विशेष लक्ष दिले पाहिजे, असे‎ प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुन‎ खोतकर यांनी केले.‎ जालना तालुक्यातील इंदेवाडी‎ येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये‎ वार्षिक स्नेहसंमेलनाचे‎ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.‎ प्रमुख पाहुणे म्हणून इंदेवाडीचे‎ सरपंच सर्जेराव शिंदे, उपसरपंच‎ परमेश्वर नामदे, शिवसेना‎ तालुकाप्रमुख भगवान अंभोरे,‎ प्रमोद वाघमारे, राहुल गवारे,‎ लक्ष्मण मोरे, जिजा रांधवन, सुमित‎ वाघमारे, पुरोहित, दीपक वैद्य,‎ छगन जाधव आदींची उपस्थिती‎ होती.

खोतकर म्हणाले, नाही‎ म्हणायला शिकलं पाहिजे. मुलांचे‎ सर्वच लाड पुरवायचे नाहीत, प्रसंगी‎ नकार पण देता आला पाहिजे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्याप्रमाणे जिजामाताने शिवाजी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महाराज आणि संभाजी महाराजांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घडवले त्याप्रमाणे तुम्ही स्वतः‎ जिजामाता बनवून मुलांना घडवले‎ पाहिजे. त्यांना चांगले संस्कार दिले‎ गेले पाहिजे. येणारे आव्हान त्यांना‎ पेलण्याची त्यांच्यात ताकद निर्माण‎ केली पाहिजे, यावेळी विद्यार्थ्यांनी‎ विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर‎ केले. सूत्रसंचालन सुनील ढाकरगे,‎ सविता गायकवाड यांनी तर एस.‎ यु. गायकवाड यांनी आभार मानले.‎ यावेळी ज्योती गायकवाड, शारदा‎ माळवदे, सीमा मराठे, विशाखा‎ बोधे, शिवानी गायकवाड, राम गोरे,‎ अर्जुन बहुले, मंदा पाटोळे आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...