आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टीकोन:आनंदी जीवन जगण्यासाठी स्वत:कडे‎ बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे‎

तळणी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धकाधकी आणि धावपळीच्या‎ युगात मनुष्य गुरफुटून गेला आहे.‎ त्यामुळे आनंदी जीवन जगण्यासाठी‎ मनुष्याने स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन‎ बदलला पाहिजे, असे शांतीब्रम्ह‎ एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज‎ महाराज गोसावी यांनी सांगितले.‎ मंठा तालुक्यातील तळणी येथील‎ अखंड हरीनाम सप्ताहात गोसावी‎ महाराजांनी कीर्तनाचे पुष्प गुंफले. संत‎ एकनाथ महाराजांच्या करा रे बापानो‎ साधन हरीचे झणी करणीचे करू नका‎ या अभंगावर त्यांनी निरुपन केले. संतांनी‎ समाजाकडे बघितल्यानंतर एक‎ विषिन्नता संत महात्माच्या अंतकरणात‎ तयार होत असते.

तेव्हा आपण‎ समाजासाठी काही तरी केले पाहिजे.‎ समाजासाठी आपण काही देणे लागतो‎ असा भाव त्यांच्या अंतकरणात तयार‎ होतो. वारकरी सप्रंदायामध्ये टप्याटप्याने‎ सर्वत्र एक ना एक महात्मासमोर‎ आलेला असून त्यांनी समाजाला‎ सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला‎ आहे. भगवतांचे नाव कोणी घ्यावे, का‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घ्यावे, कशासाठी घ्यावे, घेतले तर‎ त्याचा फायदा काय, नाही घेतले तर‎ नुकसान काय आदी सगळ्या गोष्टीचा‎ विचार संत एकनाथानी त्याच्या‎ हरीपाठातून मांडला आहे.

नाथ महाराज‎ जेव्हा हरीपाठाच्या अभंगाचा विचार‎ मांडतात किवा मार्गदर्शन करतात तेव्हा‎ त्यांच्यासमोर कुठला तरी एक व्यक्ती‎ आहे असे आपल्याला धरुन चालनार‎ नाही उपदेशात्मक अभंग जेव्हा असतात‎ त्यावेळी काही प्रकार घडत असतात.‎ त्यातील पहिला प्रकार एखाद्या‎ माणसाला केलेला उपदेश स्वतंत्रतेने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केलेला असतो. काही उपदेश‎ सर्वसमावेशक असतात.

काही गोष्टी‎ अशा असतात त्या कोणालाच‎ सांगायच्या नसतात काही गोष्टी अशा‎ असतात काहींना सांगायच्या असतात.‎ खोट बोलणे कोणाला सागायचे नसते,‎ असत्य बोलायला कोणी सांगायचे‎ नसते, मनुष्याने नेहमी सत्य बोलले‎ पाहिजे आपले शास्त्र आपल्याला सत्य‎ बोलायला शिकवते. माणसाने सत्य‎ बोलावे पण प्रिय बोलावे. आपले शास्र‎ एवढे प्रगत आहे की जगाच्या पाठीवर‎ कुठलेच शास्त्र प्रगत नाही.

नासामध्ये‎ अनेक खगोल शास्त्रज्ञ आहेत.‎ आकाशामध्ये कोणता तारा कोठे गेला,‎ सुर्यादय झाला सुर्यास्त झाला कुठले‎ ग्रहण कधी लागणार अंतरातल्या अनेक‎ बाबीच्या संशोधनासाठी अरबो रुपये‎ नासा खर्च करते पण तोच अभ्यास तेच‎ ज्ञान माहीती आपले भारतीय पंचाग‎ किती तरी काळापासून आपल्या पर्यन्त‎ कमीत कमी किंमतीत आपल्यापर्यन्त‎ पोहचवते. ते ज्ञान आपल्यासाठी‎ महत्वाचे शास्ञ, धर्माची कृपा आहे.‎

परमात्माचे स्थान हे फक्त ह्दय आहे तो‎ तेथेच राहू शकतो त्यासाठी माणसाने‎ ह्दय स्वच्छ ठेवले पािहजे. खाण्याच्या‎ वस्तू आपण स्वच्छ डब्यामध्ये ठेवतो‎ मग त्याला ठेवण्यासाठी आपले ह्दय का‎ स्वच्छ ठेऊ शकत नाही. परंतु आमचे‎ ह्दय आमचे अंत:करण हे विकाराने‎ भरलेले आहे बुजले आहे ते स्वच्छ करा‎ म्हणजे देव तेथे वास करेल बुजलेल्या‎ अतंकरणात देवाला राहण्याच स्थान‎ नाही ते स्थान निर्माण करण्यासाठी‎ मनातील अंत:रणातील घाण काढून‎ टाका तर देव तेथे वास करेल, असे‎ महाराजांनी सांगितले. यावेळी‎ पंचक्रोशीतील भाविक उ पस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...