आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्याची मागणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन २५ जानेवारी पासून पुकारले आहे. या मागण्या मान्य न झाल्याने १ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी गत १० ते १२ वषार्पासून अखंडित कामे करीत आहेत. कोविड काळातसुध्दा सर्व कर्मचाऱ्यांनी अखंडीत कामे करीत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कर्मचारी यांची ३ ते ४ वर्षापासून मानधनात वाढ नाही. कंत्राती कर्मचारीच्या मागण्या मध्ये मनरेगा स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करून कार्यरत कंत्राती कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे.
पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे. योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यासह तालुक्यामध्ये मग्रारोहयोच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आंदोलनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लोभाजी मुळे, जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश मगरे, गणेश मोरे, पालवे, संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल शेळके, सतीश बुरंगे आदींचा सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.