आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकाचे नुकसान:तळणीतील नुकसानग्रस्त भागाची‎ मंठा तहसीलदारांकडून पाहणी‎

तळणी‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील तळणी येथे झालेल्या‎ गारपीटीत नुकसान झालेल्या पीकांची‎ पाहणी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे‎ यांनी करुन नुकसानीचा अंदाज घेतला.‎ यावेळी कृषी अधिकारी व्ही. जी. राठोड,‎ मंडळ अधिकारी भगवान घुगे, आर. आर.‎ आघाव, तलाठी गोपाल कुटे, सरपंच‎ गौतम सदावर्ते, उपसरपंच विश्वनाथसिंग‎ चंदेल, ज्ञानेश्वर सरकटे, करीम पठाण,‎ गजानन सरकटे, विश्वभंर सरकटे, बाबू‎ मूळे आदींची उपस्थिती होती.‎

तहसीलदार वाघमारे यांनी सांगितले,‎ शासनाच्या ३३ टक्के नुकसानीची‎ अलीच्या अधीन राहुनच शेतकऱ्यांना‎ मदत होऊ शकते बहुतांश शेतकऱ्यांनी गहु‎ व हरभरा सुरक्षीत ठेवला असून पीक विमा‎ भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिक विमा‎ कंपनीकडे तक्रार करावी.

तसेच हवामान‎ खात्याने आणखी दोन दिवस पावसाची‎ शक्यता वर्तवली आहे या दोन दिवसात‎ आणखी काही नुकसान झाले तर नुकसान‎ ग्रस्त शेतीची पंचनामे करण्यात येतील,‎ असे वाघमारे यांनी सांगितले.‎ सद्यःस्थितीत ज्वारी पिकांचे मोठे नुकसान‎ झाल्याने जनावाराना चारा व ज्वारीच्या‎ उत्पादनाला फटका बसणार असल्याचे‎ शेतकरी बाबूराव रणमुळे यांनी सांगितले‎ तर सिडस कादा उत्पादक शेतकरी‎ विश्वबर सरकटे यांनी तहसीलदारांना‎ कांदा पिकाचे नुकसान गारपीटीने कसे होते‎ याचे प्रात्यक्षीक स्वरुपात दाखवून दिले.‎ तळणी परिसरात झालेल्या गारपीटीमुळे‎ शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, कांदाचे नुकसान‎ झाले नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून‎ तत्काळ मदत करावी अशी मागणी सरपंच‎ गौतम सदावर्ते यांनी तहसीलदारांकडे‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...