आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे श्रीमती गंगुबाई राघोजी साळवे चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या समता सैनिक दलाच्या ९६ व्या वर्धापन दिनानिमित्त धम्म गंगा बुद्ध विहारात बाल, नवयुवक आणि महिलांसाठी एक दिवसाचे समता सैनिक दल प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समता सैनिक दलाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे, मेजर अनिल राऊत, मेजर गायकवाड, डि. ओ. दांडगे, कमांडर ऑफिसर भिसे यांची उपस्थिती होती. यावेळी ध्वजारोहण, दहा मिनिटाचे आनापान सत्र, सामूहिक त्रिशरण पंचशील आणि वंदना घेऊन प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.
कवायत, संचालन, लाठीकाठी व स्वरक्षणाचे विविध पैलू शिकविण्यात येऊन त्याचे प्रात्यक्षीक करून घेतले. आयोजक कृष्णा साळवे यांनी धम्म गंगा बुद्ध विहाराची वाटचाल व उद्दिष्टे सांगून समता सैनिक दलाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ रोजी महाड येथे केली होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक आता मान वर करू लागले होते.
माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होते. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी संत सैनिक चळवळीची ताकद कामी आली व आजही ही टिकून आहे असे सांगितले. यावेळी शाहिर रामराव खरात, नंदा साळवे यांच्या भीम, बुद्ध गीतांचा कार्यक्रम झाला. लक्ष्मीबाई साळवे यांनी आभार मानले. प्रशिक्षणासाठी साहेबराव साळवे, राजेंद्र साळवे, दादाराव साळवे, विजय साळवे, दिलीप साळवे परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.