आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलपुनर्भरण‎:जलतारा ची 50 गावांमध्ये जलक्रांती;‎ आता २४५ गावांत होणार जलपुनर्भरण‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात पडणारे पाणी ज्या खोलगट भागात थांबते त्या‎ ठिकाणी ४ बाय ४ आणि ६ फूट खोलीचा खड्डा खोदून‎ त्यात दगड, वाळू भरून तो बुजवून टाकला जातो. अशा‎ प्रकारचे २० हजार खड्डे (जलतारे) दोन वर्षांत ५० गावांत‎ जलतारा प्रकल्पांतर्गत मोफत खोदून देण्यात आली‎ आहेत. यामुळे पावसाचे पाणी जमिनीतच मुरले असून‎ त्या क्षेत्रातील विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.

यामुळे‎ कोरडवाहू शेतीत गहू, हरभऱ्याचे पीक घेता आले आहे.‎ अशा प्रकारचे तब्बल २४५ गावांत जलतारे निर्माण‎ करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी (२ जानेवारी)‎ श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते केला जाणार आहे.‎ पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर आपल्या एक एकर‎ क्षेत्रामध्ये पाणी वाहत असताना एका कोपऱ्याला येऊन‎ थांबते. त्या कोपऱ्याला आपण चार फूट रुंद चार फूट लांब‎ व सहा फूट खोलीचा एक खड्डा करतो. ज्यामध्ये‎ शेतकऱ्यांनी दगड भरून तो खड्डा बुजवून टाकावा‎ लागतो.

एका एकरामध्ये आलेले सर्व पाणी त्या‎ खड्ड्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीचा भूगर्भामध्ये‎ जाते. असे प्रत्येक शेतकऱ्याने एक एकरमध्ये प्रत्येकी एक‎ खड्डा असे गावभर जेवढे शिवार आहे त्यानुसार खड्डे‎ निर्माण केले जातात. जेसीबी मशीनद्वारे हे खड्डे खोदले‎ जातात. शेतकऱ्यांना केवळ त्यामध्ये दगडे भरावे‎ लागतात. असे हजारो जलताराचे शोषखड्डे गावच्या‎ शिवारात करणे हा प्रकल्प आहे. चार महिने पावसाळ्यात‎ पडलेला पाऊस गावाचे शिवार सोडून बाहेर जात नाही.‎ तो शिवारामध्येच थांबतो व शिवारामध्येच मुरून प्रचंड‎ पाणीपातळी वाढते.

यामुळे मागील दोन वर्षांत झालेल्या‎ ५० पैकी ३७ गावांमध्ये मोठा परिणाम झाल्याचे शेतकरी‎ अनुभवत आहेत. २५ वर्षांपासून कोरडवाहू असलेली‎ शेती पाण्याची पातळी वाढल्यामुळे बागायती बनली‎ असून दोन पिकावरून शेतकरी तीन पिकांवर गेले आहेत.‎ पिण्याच्या पाण्याची टंचाई संपली व शेतीला बारमाही‎ पाणी उपलब्ध झाले. त्यातून पिकांची संख्या वाढून‎ आर्थिक समृद्धता निर्माण झाली आहे. यामुळे जालना,‎ परतूर आणि मंठा या तालुक्यात प्रकल्प हाती घेण्यात‎ आला आहे.‎

अशी राबवली जाते प्रक्रिया‎
हा संपूर्ण प्रकल्प सहा महिन्यांमध्ये पूर्ण केला जातो. चार महिन्यांमध्ये‎ गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा सर्व्हे करणे, जिओ टॅगिंग करणे,‎ जमिनीचा उतार काढणे, पाणीपातळी प्रत्येक महिन्याला मोजणे, पीक‎ परिस्थितीची पाहणी करणे. सोबत जलताराचे प्रबोधन करणे आणि १‎ एप्रिलपासून १५ जूनपर्यंत जेसीबी मशीनच्या साह्याने संस्थेच्या वतीने‎ प्रत्येक गावामध्ये प्रत्येक एका एकर क्षेत्रात एक खड्डा तयार करून‎ दिला जातो. यामध्ये शेतकऱ्यांना दगड टाकावे लागतात.‎

मागील प्रयोग यशस्वी, आता नवा मार्ग‎
शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची उपलब्धी व्हावी यासाठी हा उपक्रम‎ हाती घेण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात सुरुवातीला ५० गावांची‎ निवड करण्यात आली. जमिनीचा तसेच पावसाचे पडणारे पाणी याचा‎ सहा महिने अभ्यास केला. त्यानंतर त्या गावांत खड्डे (जलतारे)‎ खोदून त्यापासून मिळणारे फायदेही अनुभवले. यामुळे आता २४५‎ गावांचे लक्ष्य हाती घेण्यात आले आहे.‎ -डॉ. पुरुषोत्तम वायाळ, जलतारा प्रकल्प समन्वयक‎

वाटूर फाटा येथे सकाळी‎ ११ वाजता कार्यक्रम‎
जिल्हातील २४५ गावांत जलतारे‎ निर्माण करण्याच्या उपक्रमाचा‎शुभारंभ गुरुवारी‎(२ जानेवारी)‎श्री. श्री.‎रविशंकर यांच्या‎हस्ते परतूर‎तालुक्यातील‎ वाटूर फाटा येथे सकाळी ११ वाजता‎ होणार आहे. या कार्यक्रमाला‎ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ यांची प्रमुख उपस्थिती राहणार‎ आहे. तसेच श्री श्री रविशंकर यांच्या‎ उपस्थितीत शेतकरी मेळावाही‎ याठिकाणी आयोजित केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...