आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वतंत्र चळवळीपासून आजवर केवळ लोकशाहीचा सन्मान करत सामान्यांच्या भावना जोपासणारी काँग्रेस परिवारातील नेते राहुल गांधी यांची पाऊले मराठवाड्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांत जोष, चैतन्य निर्माण झाले असल्याचे गौरवउद्गार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी काढले.
भारत जोडो यात्रा निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत देगलूर ते नांदेड सभास्थानापर्यंत जेथलिया यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, राजेंद्र राख, कल्याणराव दळे, किसनराव मोरे, अण्णासाहेब खंदारे, माऊली तनपुरे, दिलीप चव्हाण, सादेक जहागीरदार, मंठा तालुकाध्यक्ष निळकंठराव वायाळ, विष्णू चव्हाण, जालना तालुकाध्यक्ष वसंतराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
या यात्रेत सहभाग नोंदवल्यावर आपल्या प्रतिक्रियेत जेथलिया म्हणाले, देशाच्या जडणघडणीत गांधी परिवाराचे मोठे योगदान असून देशासाठी त्यांच्या परिवातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली. आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत चालताना वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील काँग्रेसला या यात्रे निमित्त नवचैतन्य मिळाले असून, काँग्रेस कार्यकर्त्यांत वेगळाच उत्साह संचारल्याचे निदर्शनात येत आहे, असे अनेक अनुभव कथन करीत ही यात्रा देशाला नवी दिशा देणारी ठरणार असून, कार्यकर्त्यांनी पक्ष चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन जेथलिया यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.