आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआई-वडिलांच्या चरणातच काशी आणि चार धाम आहेत. परंतु आज समाजात जन्मदात्या आई-वडिलांविषयी प्रेम लुप्त होत चालले आहे मुलांनाच लग्न झाल्यावर आई-वडिलांचे ओझे वाटू लागले आहे. परंतु तुम्ही जगभरातील संपत्ती कमवा तिचे महत्त्व आई-वडिलांसमोर नगण्य आहे. ज्या घरात आई-वडील नावाचा सुगंध दरवळत असतो त्याच घरात भगवंतदेखील सहवास करीत असतो. कारण आई-वडील हा जन्मातील सर्वात अनमोल ठेवा आहे जो नित्याप्रमाणे आईवडिलांची सेवा करीत असतो त्याला साक्षात परमेश्वर भेटण्यासाठी येतो. उतारवयात आई-वडिलांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा असल्याचे कृष्णा महाराज मोकासरे पिशोरकर यांनी सांगितले.
भोकरदन तालुक्यातील धावडापासून जवळच असलेल्या वडाळी येथे अखंड हरिनाम सप्ताह, रामकथा व कीर्तन सोहळा सुरु आहे. यात कीर्तनाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. आजच्या तरुणांनी श्रावण बाळाप्रमाणे आई-वडिलांची सेवा केली पाहिजे, उतार वयातच आई-वडिलांना आपली खरी गरज असते त्या काळातच त्यांची लहान लेकराप्रमाणे सेवा केली पाहिजे कारण आपण लहान असताना आई-वडील आपल्याला मोठे करेपर्यंत मोठे हाल अपेष्टा सहन करत असतात. त्यासाठी त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तुम्ही त्यांचे दास व्हा असे केल्यास परेमेश्वर तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही. न मागता सरळ तुमच्या पदरात टाकेल तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांनी आत्मविश्वासाने घ्यायची उंची भरारी घेतली पाहिजे. जो मनामध्ये ध्येय ठेवून वाटचाल करत असतो तोच जीवनात यशाचा डोलारा करीत असल्याचे कृष्णा महाराजांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.