आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महिला सुरक्षेबाबतच्या कायद्याची नीटपणे अंमलबजावणी करीत नसल्याची तक्रार जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नंदा पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणी दरम्यान पवार यांनी सौ. चाकणकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जालना जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून महिलावरील अन्याय- अत्याचाराचे प्रकार सुरू आहेत. अनेक महिला ह्या दिवसाढवळ्या गायब होत आहेत, विनयभंगाच्या घटना वाढल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.