आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील जालना-बदनापूर तालुक्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक व स्वातंत्र्य सैनिक वारसपत्नी निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय जालना येथील खोली क्र.११ मध्ये तातडीने सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी केले आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन धारकांकडून ह्यातीचे प्रमाणपत्र वर्षातून दोन वेळा म्हणजेच जानेवारी व जुलै या महिन्यात पहिल्या दिवशीच घ्यावे, त्याशिवाय निवृत्ती वेतनाचे प्रदान करण्यात येवू नये, असे १५ डिसेंबर २०१४ रोजीच्या परिपत्रकान्वये सुचित केलेले आहे.
ह्यातीचे प्रमाणपत्र विलंबाने दिल्यास थकबाकीसह निवृत्तीवेतन देण्यात येते. स्वातंत्र सैनिक व स्वातंत्र्य सैनिक वारसपत्नी निवृत्तीवेतनधारकांनी विहीत वेळेत हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय येथे सादर करणे आवश्यक आहे. ह्यात प्रमाणपत्र विलंबाने प्राप्त झाल्यास निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विलंब होवू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.