आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमानी कारभार:शेतकऱ्यांना महावितरणचा शॉक;‎ वीज जोडणीविनाच ७ हजारांचे देयक‎

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई‎ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव‎ रेणुकाई येथे महावितरणचा‎ अफलातुन कारभार चव्हाट्यावर‎ आला आहे. शेतात वीज जोडणी‎ नसताना देखील येथील चार‎ शेतकऱ्यांना तब्बल ७ हजार ४६४‎ रुपयाची बिल पाठवून महावितरणने‎ नवीनच पराक्रम केला असल्याने‎ शेतकरी वर्गात एकच खळबळ‎ उडाली आहे.‎ काही वर्षापूर्वी पिंपळगाव रेणुकाई‎ येथे शासनाच्या वतीने एक शेतकरी‎ एक डीपी ही योजना राबविण्यात‎ आली होती. शेतकऱ्यांना वीज पुरवठा‎ सुरळीत होऊन शेती विकासात वाढ‎ व्हावी असा शासनाचा यामागचा‎ उद्देश होता.

दरम्यान पिंपळगाव‎ रेणुकाई येथील शेतकऱ्यांनी देखील‎ योजना फायद्याची असल्याने‎ थ्री.एच.पी.चे कोटेशन भरुन सदर‎ योजनेचा लाभ घेण्यासाठी‎ महावितरणकडे प्रस्ताव सादर केले‎ होते. यामध्ये संबंधित कंत्राटदाराने‎ काही शेतकऱ्यांचे काम पूर्ण केले तर‎ काही ठिकाणी केवळ पोल उभे करुन‎ पळ काढला असल्याचे शेतकरी‎ सांगत आहे. विशेष म्हणजे सदर‎ योजनेत कोटेशन भरलेले शांताबाई‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शामराव नरवाडे, अशरफ खान‎ बलदर खान पठाण, दादाराव गणपत‎ जाधव, विजय खंडेराव देशमुख‎ आदी शेतकऱ्यांना वीज जोडणी न‎ करताच महावितरणने विज देयके‎ पाठवले असल्याने शेतकऱ्यांना मोठा‎ झटका बसला. याबाबत शेतकऱ्यांनी‎ तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र‎ काहीच उपयोग होत नसल्याने‎ शेतकरी त्रस्त झाले आहेत. बांधावर‎ केवळ पोल उभे आहे. विद्युत वाहिन्या‎ जोडल्या गेल्या नाही मग बिल आले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कसे हा संशोधनाचा विषय ठरत आहे.‎

सध्या शेतकरी सततच्या नैसर्गिक‎ संकटामुळे हतबल झाले आहेत.‎ यंदा खरीपात झालेल्या अतिवृष्टीत‎ पिकांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे‎ हातात काहीच लागले नाही.‎ पेरणीसाठी घेतलेली उसनवारी कशी‎ फेडावी या विवंचनेत शेतकरी‎ असताना महावितरणकडून‎ शेतकऱ्यांची अशाप्रकारे होत‎ असलेली लुट पाहता शेतकऱ्यांना‎ मोठा मनस्ताप होत आहे. याबाबत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे अर्ज देखील‎ सादर केले आहे. माञ संबंधित‎ अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही‎ केली नसल्याचे शेतकरी सांगत आहे.‎ महावितरण घरगुती ग्राहकांना देखील‎ अव्वाच्या सव्वा बिल आकारणी‎ करुन विद्युत ग्राहकांची देखील‎ फसवणूक करत असल्याच्या असंख्य‎ तक्रारी आहे. याबाबत संबंधित‎ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा‎ प्रयत्न केला असता ते नेहमीप्रमाणे‎ नाटरिचेबल दिसुन आले.‎

अनेक तक्रारी केल्या‎ मी थ्री एच. पीच्या कृषी पंपासाठी‎ कोटेशन भरले होते. माञ शेतात केवळ‎ पोल ऊभे करुन विद्युत वाहिन्या न‎ जोडताच संबंधित कंत्राटदार फरार‎ झाला आहे. वीज जोडणी नसताना‎ हजारो रुपयाची बिल माझ्यासह अनेक‎ शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे.‎ याबाबत वरिष्ठाकडे तक्रार अर्ज‎ देखील सादर केले आहे. माञ‎ वरिष्ठाकडून कुठल्याही प्रकारची‎ कार्यवाही किंवा दखल घेतली जात‎ नसल्याने आता आम्ही न्याय कुणाकडे‎ मागावा असा प्रश्न आहे. या प्रकरणी‎ चौकशी होणे गरजेचे असल्याचे विजय‎ देशमुख म्हणाले.‎

बातम्या आणखी आहेत...