आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:शास्त्रोक्त पद्धतीने मोसंबीचे व्यवस्थापन करावे‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने‎ मोसंबीचे व्यवस्थापन करून‎ हवामान बदलावर मात करावी, असे‎ आवाहन औरंगाबाद येथील फळ‎ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी‎ डॉ. एम. बी. पाटील यांनी केले‎ आहे. "बदलत्या हवामानात मोसंबी‎ पिकाचे व्यवस्थापन" या विषयावर‎ कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी द्वारे‎ नुकत्याच आयोजित केलेल्या कृषि‎ विज्ञान मंडळाच्या ३०६ व्या मासिक‎ चर्चासत्रात डॉ. पाटील बोलत होते.‎

या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे‎ प्रकल्प संचालक कृषीरत्न विजय‎ आण्णा बोराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व‎ प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, निवृत्त‎ सहआयुक्त (जीएसटी) डॉ.‎ नीलकंठ डाके, शहर वाहतूक‎ शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. टी.‎ राऊत, सहाय्यक मोटर वाहन‎ निरीक्षक ए. आर. जोगदंड यांची‎ उपस्थिती होती.‎ डॉ. पाटील पुढे बोलतांना म्हणाले‎ की, सध्याच्या बदलत्या हवामानात‎ मोसंबीची फळगळ, फळांवर काळे‎ चट्टे पडणे, फळमाशी आणि‎ फळांतील रस शोषणाऱ्या पतंगाचा‎ प्रादुर्भाव, डिंक्या व डायबॅक, सिट्रस‎ ग्रीनिंग ह्या मोसंबीतील प्रमुख‎ समस्या आहेत. माती परीक्षण‎ केल्याशिवाय मोसंबी लावू नये. दहा‎ टक्क्यांपेक्षा अधिक चुनखडी‎ असल्यास अशा जमिनीत मोसंबी‎ लावू नये.

शिफारशी प्रमाणे‎ अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे‎ अत्यंत महत्वाचे आहे. मोसंबीची‎ बाग विक्री करतांना चार पाण्यावर‎ मोसंबीची बाग देण्याची पद्धत बंद‎ करावी. न्युसेलर ही सर्वोत्कृष्ट जात‎ असून या जातीचे उत्पन्न इतर‎ जातींपेक्षा १५ टक्क्यांनी जास्त‎ मिळते. काटोल गोल्ड आणि फुले‎ मोसंबी हया न्यूसेलरच्याच प्रजाती‎ आहेत. सिट्रस ग्रीनिंग हा रोग‎ अन्नद्रव्यांच्या अभावामुळे होतो.‎ लागवड करतांना स्वतःकडील‎ रंगपूर खुंटावर तयार केलेले रोप‎ वापरणे चांगले. त्यानंतर पोलीस‎ उपनिरिक्षक जी. टी. राऊत आणि‎ सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ए.‎ आर. जोगदंड यांनी "रस्त्यावरील‎ अपघात आणि वाहतुकीचे नियम"‎‎‎‎‎‎‎‎‎ या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना‎ सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच‎ सर्वांना रस्ता सुरक्षेतेची शपथ‎ देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी‎ विजयआण्णा बोराडे यांनी मोसंबी‎ लागवड करण्यापूर्वी शास्त्रज्ञांकडून‎ आर्किटेक्ट प्रमाणे प्लॅन घ्यावा व‎ मगच लागवड करावी असे‎ सांगितले. मोसंबी फळांची ग्रेडिंग‎ करणे आवश्यक असून जमिनीच्या‎‎‎‎‎‎‎‎‎ निचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी‎ सबसॉयलरचा वापर शेतकऱ्यांनी‎ करावा असे आवाहन त्यांनी केले.‎ प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पाच प्रश्नांची‎ सलग उत्तरे देणाऱ्या निवृत्ती चांदगुडे‎ या शेतकऱ्याला मान्यवरांचे हस्ते‎ चांदीचे पदक देऊन सत्कार‎ करण्यात आला. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख‎ डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...