आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार‎:ना हुंडा, ना लग्नात डीजे; 40 तरुणांचे समाजमंदिरात लग्न‎

लहू गाढे | जालना‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसोहळ्यात प्री-वेडिंग, डीजे, हजारो‎ पाहुणे, मित्रमंडळीची उपस्थिती,‎ सोहळ्यातील मौजमजा, विविध‎ अन्नपदार्थ यावर लाखोंचा खर्च करून‎ अनेक जण कर्जबाजारी होतात. यामुळे‎ कौटुंबिक अनेक समस्या उभ्या राहून‎ काही वेळा आत्महत्यांच्या घटनाही‎ घडतात. यामुळे हुंडा न घेण्यासह व‎ देण्यासह अनावश्यक खर्चाला फाटा‎ देऊन अगदी साध्या पध्दतीने विवाह‎ सोहळे पार पाडण्याचा पायंडा लाड‎ गवळी समाजाने सुरू केला आहे.‎ वर्षभरात ४० तरुणांचे साध्या पद्धतीने‎ समाजाच्या कार्यालयात विवाह सोहळे‎ पार पडले आहेत. अगदी साध्या पध्दतीने‎ मुहूर्तावरच होणारे हे लग्न सोहळे इतर‎ समाजासाठी आदर्शदायी ठरू लागले.‎ विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या‎ जीवनातील एक अविस्मरणीय क्षण‎ असतो. हा सोहळा भव्यदिव्य होण्याचा‎ अनेक पालकांना मोह आवरता येत नाही.‎

परंतु, या सोहळ्यावर झालेला‎ अनावश्यक खर्च, यातून‎ कर्जबाजारीपणा, हुंडा पध्दत यामुळे‎ कर्जबाजारी झालेल्या अनेक पालकांनी‎ आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या‎ आहेत. यामुळे नवरदेव व नवरी अशा‎ दोन्ही कुटुंबीयांवर कुठलाही आर्थीक भार‎ पडणार नाही, या दृष्टीने संपूर्ण‎ महाराष्ट्रात लाड गवळी समाजाने साध्या‎ पध्दतीनेच विवाह सोहळे सुरू केले‎ आहेत. जालन्यातही या विवाह‎ सोहळ्यांचा मार्ग अवलंबण्यात आला‎ आहे. अनावश्यक खर्चामुळे श्रीमंत‎ वर्गावर फारसा परिणाम होत नाही. परंतु,‎ मध्यमवर्गीय शेतकरी आणि आर्थिक‎ परिस्थिती बिकट असणाऱ्या परिवारांवर‎ त्याचा प्रभाव आणि ताण पडत आहे.‎ आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या‎ परिवारावर या सर्व प्रकारचा आर्थिक‎ ताण निर्माण झाल्याने त्यांच्या कर्जात‎ देखील वाढ झाली आहे. जालना‎ शहरातील जुना जालना भागातील गवळी‎ मोहल्ला येथे समाज मंदिर करण्यात‎ आले आहे. समाजातील सर्वच विवाह‎ सोहळे या ठिकाणी होत आहेत. हुुंड्याचा‎ विषय आला की, सर्व समाजच त्या‎ कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे‎ आदर्श लाड गवळी समाजाने सुरू केला‎ आहे.‎

प्रत्येकाने हुंडा न घेण्याची पद्धत केली सुरू‎
डीजे लावल्यास तरुणांच्या नाचण्यासह कुठे मद्य विक्री झाल्यास अनेक तरुण‎ या ठिकाणी नाचत असल्याने अनेक लग्न उशिराने लावण्याला कारण ठरत‎ आहे. यामुळे लाड गवळी समाजाने प्रत्येकाने लग्न समारंभात डीजे न लावणे,‎ हुंडा न घेणे, देणे ही पद्धतच समाजाने सुरू केली आहे.‎

राज्यभरात होतोय अवलंब‎
लाड गवळी समाजाने संपूर्ण‎ महाराष्ट्रात याचा अवलंब केला‎ आहे. हुंडा पद्धतच बंद केल्याने‎ आतापर्यंत एकही फारकतीचे प्रकरण‎ समोर आले नाही. शिवाय, तरुणांनी‎ व्यसनांपासून लांब ठेवण्यासाठी हा‎ उपक्रम राबवल्या जात आहे.‎ समाजातील ज्येष्ठ मंडळीसह‎ तरुणांची साथ मिळत असल्याने हा‎ आदर्श निर्माण करु शकत आहे. इतर‎ समाजांनीही याचा अवलंब केल्यास‎ कुणीही कर्जबाजारी होणार नाही.‎ - गणेश सुपारकर, माजी‎ अध्यक्ष,लाड गवळी समाज, जालना‎‎

बातम्या आणखी आहेत...