आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक‎ नुकसान नाही ; ‎जिल्हाधिकारी‎

जालना‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी‎ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात‎ रब्बी पिके भुईसपाट झाली. ऐन‎ काढणी, सोंगणीला आलेली पिके‎ आडवी झाल्याचे पाहून‎ शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.‎ मात्र, जिल्ह्यात शेती पिकांचे ३३‎ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान‎ नसल्याची प्राथमिक माहिती‎ आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय‎ राठोड यांनी सांगितले.

तर, वीज‎ पडून ७ जनावरे दगावल्याचे ते‎ म्हणाले. यामुळे प्रत्यक्षात नुकसान‎ होऊनही प्रशासनाच्या लेखी तशी‎ नोंद होत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा‎ एकदा संकटात सापडले आहेत.‎ गतवर्षी अतिवृष्टी, पूर, परतीच्या‎ मान्सूनमुळे खरिपाची नासाडी झाली‎ होती. राज्य सरकारने‎ एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट‎ मदतीची घोषणा केली, मात्र ६ ते ७‎ महिने होत आले तरीही मदत‎ मिळाली नाही.

जालना जिल्ह्यातील‎ ३ लाख ८४ हजार ९४ शेतकरी या‎ मदतीपासून वंचित आहेत.‎ गतवर्षीच्या संकटाची सल कायम‎ असताना पुन्हा तीन दिवसांपूर्वी‎ अवकाळी पावसाने गाठल्यामुळे‎ शेतकरी पुरते हवालदिल झाले‎ आहेत. सुरुवातीला कापूस,‎ सोयाबीन, मका, मूग, उडीद व‎ आता रब्बीतील हरभरा, ज्वारी, गहू‎ पिकांचे नुकसान झाले आहे.‎ निसर्गाच्या या लहरीपणामुळे‎ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा‎ जीव मेटाकुटीस आला असून‎ सरकारने तत्काळ मदत करावी,‎ अशी मागणी जोर धरू लागली‎ आहे. लोकप्रतिनिधींकडून थेट‎ बांधावर जाऊन पाहणी केली जात‎ आहे, मदत मिळवून देण्याचे‎ आश्वासनही दिले जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...