आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ह्या राष्ट्रीय समाज पक्ष जिंकण्यासाठीच स्वबळावर लढणार असून निवडणुकांत विजय संपादन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाची जालना जिल्हा स्तरीय आढावा बैठक बुधवारी राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश चितळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे, जिल्हा संपर्क प्रमुख विनोद मावकर, लोकसभा अध्यक्ष पुंजाराम खर्जुले, युवक जिल्हाध्यक्ष गोविंद जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रा. गोरे पुढे म्हणाले, विस्थापितांना संघटीत करून प्रस्थापित करण्यासाठी महादेव जानकर यांनी दिन, दलित, बहुजन, समाजातील होतकरू समाजसेवेत सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग मिळावा यासाठी चालवलेली चळवळ राज्यात गतिमान करून, पक्ष वाढीसाठी मराठवाड्यातील जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणी सुरू आहे.
जातनिहाय जनगणनेस रासप आग्रही असून जातिनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण व स्थानिक प्रश्नांवर जनजागृती करून संघटन वाढवावे, असे आवाहन केले. या वेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात जिल्हा सरचिटणीस कैलास कोळेकर, जिल्हा संपर्क प्रमुख विनोद मावकर, उपाध्यक्ष विठ्ठल तोतरे, बदनापूर तालुकाध्यक्ष अंकुश घाडगे, बदनापूर लीगल सेल तालुकाध्यक्ष अॅड. सिद्धेश्वर खरात यांना नियुक्ती पञे देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.