आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने जालन्याच्या द्राक्ष हबवर सडवा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष उत्पादक त्रस्त झाले होते. या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी बेमोसमी पाऊस तसेच गारपिटीने जवळपास अर्धा तास झोडपले. यामध्ये द्राक्षबागा पूर्णपणे झोडपल्या गेल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
जालना तालुक्यातील कडवंची तसेच परिसरातील अंभुरेवाडी, धारकल्याण, नाव्हा, नंदापूर, वडगाव वखारी आदी गावांत द्राक्षबागेची मोठी शेती असून मागील पंधरवड्यापासून वातावरणात बदल होत असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला हाेता. यावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरू असताना मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाची भर पडली.
द्राक्षांच्या घडावर पडणाऱ्या पावसाचे स्थलांतर होऊन नायट्राेजनचे प्रमाण वाढत आहे. परिणामी द्राक्षांचे मणी फुटून सडवा लागल्याने ७० टक्क्यांवरील उत्पादनाला फटका बसला आहे. असे असताना शनिवारी मोठ्या प्रमाणात बेमोसमी पावसासह गारपीट झाली. यामध्ये कडवंची, नदापूर, अंभोरेवाडी, नंदापूर, धारकल्याण, भोरखेडी, न्हावा तसेेच वरूड या गावांना फटका बसला. पाच ते दहा रुपये किलो जाईल असा तरी माल होता. शनिवारच्या गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट झाला असल्याचे कडवंची येथील शेतकरी बालाजी कुदळे, उमा क्षीरसागर यांनी सांगितले.
शंभर टक्के नुकसान
मागील पंधरा दिवसांपासून संकट सुरू होते. शनिवारी कहर पाहायला मिळाला. तब्बल अर्धा तास बोरांसारखी गारपीट झाल्याने द्राक्षबागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. - नागेश अंभोरे, शेतकरी कडवंची
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.