आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगाम २०२२ ला सुरुवात झाली असून पावसानेही तुरळक हजेरी लावली आहे. मात्र, पेरणीसाठी हा पाऊस योग्य नसून शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे. सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी अन् चांगला पाऊस असेल तरच पेरणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
जालना जिल्ह्यात एकूण साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी होणार असून यामध्ये सर्वाधिक म्हणजेच तीन लाखांच्या घरात कपाशी, त्याखालोखाल दोन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होईल.
दरम्यान, दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. प्रतिहेक्टर बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया करावी.
१०० मिमी पाऊस असेल तरच पेरणी
शेतकऱ्यांनी आर्थिक संकट अंगावर ओढवेल अशी कामे टाळावी. पाऊस ७५ ते १०० मिमी इतका असेल तरच पेरणीकडे वळावे. शिवाय बियाण्यांवर प्रक्रिया करावी, ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.