आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या काळात कलीयुगाला सुरुवात झाली असुन तरुण पिढी मोठी मोबाईलसह इतर व्यसनाच्या नादी लागली असुन अशी पिढी तयार झाल्यास धर्म संस्कृती नामशेष होण्याची शक्यता नाकारता येणार नसुन प्रामुख्याने सांप्रदायीक क्षेत्रात मोठा बदल झाला असुन या सांप्रदायामुळेच धर्म संस्कृती टिकुन आहे आणि टिकेल, असे प्रतिपादन किर्तपकसा तथा प्रबोधनकार संगिताताई व्यवहारे यांनी केले. आलापूर येथील सिध्देश्वर नगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी या अभंगावर विविध दृष्टांतांची उदाहरणे देत निरुपण केले.
ज्यांच्या अंगी दया आहे ते या जगात धन्य आहेत. कारण ते केवळ उपकारासाठीच आले असुन त्यांचे घर हे वैकुंठात आहे आणि ते कधी लटीके बोलत नाहीत आणि देहा संबधी उदास असतात. तरुण आणि लहान मुलांनी मोबाईलचा वापर कमी करून आपले पुढील भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, आई वडीलांनी देखील आपली मुल कशी वागतात हे ओळखून योग्य पर्याय निवडावा व सर्वांनी इतरांच्या सुख दुखात सामील सामील होऊन परोपकारी बना, असा संदेशही यावेळी संगीता व्यवहारे यांनी िदला. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.