आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अतिवृष्टी, खराब हवामानावर मात; तुरीचे बंपर उत्पादन‎

कृष्णा तिडके | जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे‎ तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात‎ फटका बसला. त्यातच खराब‎ हवामानामुळेही पिकाचे नुकसान‎ झाले. तरीही आंतरपीक म्हणून‎ घेतलेल्या तुरीची उत्पादकता‎ चांगलीच वाढली आहे. त्यामुळेच‎ गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत‎ बाजारात ५० हजार क्विंटल अधिक‎ तुरीची आवक झाली आहे. आवक‎ जास्त असूनही हमीभावापेक्षा ३०० ते‎ ५०० रुपये अधिकचा दर मिळतो.‎ जिल्ह्यात यावर्षी जवळपास‎ सव्वा लाख हेक्टरवर तुरीची पेरणी‎ करण्यात आली होती. मात्र‎ जुलैमध्ये सलग पावसामुळे अनेक‎ ठिकाणी तुरीचे मोठ्या प्रमाणात‎ नुकसान झाले.

सलग पेरणी‎ केलेल्या तूर पिकाचे नुकसान झाले‎ असताना दुसरीकडे आंतरपीक‎ म्हणून ज्या ठिकाणी तुरीची पेरणी‎ करण्यात आली होती तेथे अधिकचे‎ उत्पादन मिळत असल्याचा अनुभव‎ शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.‎ त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत‎ फेब्रुवारीच्या पहिल्या‎ आठवड्यापर्यंत जालना बाजार‎ समिती ५० हजार क्विंटल तुरीची‎ अतिरिक्त आवक झाली. तुरीला‎ कमाल भाव ७३०० तर किमान दर ५‎ हजार रुपयापर्यंत मिळत असून‎ सरासरी दर ७०००रुपयापर्यंत आहे.‎

तर तुरीचे दर वाढणार‎ जालना बाजार समितीत‎ जालना जिल्हा व्यतिरिक्त‎ शेजारच्या बीड, परभणी आणि‎ बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या‎ प्रमाणात तुरीची आवक होत‎ आहे. हमीभावापेक्षा अधिकचा‎ दर मिळत असल्याने सध्या‎ तरी शेतकऱ्यांना हमीभाव‎ केंद्राची गरज वाटत नाही. परंतु‎ सरकारने तुरीचा बंपर स्टॉक‎ करण्यासाठी खुल्या बाजारातून‎ तूर खरेदी केली तर तुरीच्या‎ दरात आणखी वाढ होऊ‎ शकते असा अंदाज व्यक्त‎ केला जात आहे.‎

गतवर्षीपेक्षा अधिकची आवक‎ गतवर्षी सहा डिसेंबर ६ डिसेंबर २०२१ पासून बाजारात तूर येण्यास सुरुवात झाली‎ होती. यावर्षी १० डिसेंबर २०२२ पासून बाजारात तूर येण्यास सुरुवात झाली आहे.‎ आजपर्यंत २ लाख ११ हजार ६१६ क्विंटल तूर बाजारात आली असून तब्बल १४६‎ कोटी ७२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...