आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखंडणी मागण्यासाठी कंपनीत येऊन गोंधळ घालणाऱ्याला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवून खंजीर, चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री खादगाव परिसरात घडली. या घटनेत दोन पोलिस जखमी झाले. पप्पू कचरू घोरपडे, नवनाथ शिवदास नाईकवाडे, तेजराव खडेकर (खादगाव), चंदू अंबिलढगे (शेकटा, जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत, तर प्रभाकर वाघ, एम. वेताळ अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
खादगाव परिसरातील सिद्धार्थ अॅग्रो प्रॉडक्ट कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास काही जण गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचे पोलिसांना कळले. या माहितीच्या आधारे चंदनझिरा ठाण्यातील एम. वेताळ, प्रभाकर वाघ हे घटनास्थळी गेले. या ठिकाणी असलेल्या आरोपींनी हातात खंजीर, चाकूने वार केल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या एकाच्या हाताला तर दुसऱ्याच्या छातीला जखम झाली.
याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक संदीप सावळे करत आहेत. दरम्यान, यातील एका आरोपीस जेरबंद करण्यात आले. ३ आरोपी फरार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.