आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण मिळते‎; मुख्याध्यापक ताठे यांचे प्रतिपादन

मंठा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि‎ नाविन्यपूर्ण अनुभव व प्रत्यक्ष कृतीतून‎ व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा उपयोगी ठरत असल्याचे मत‎ मुख्याध्यापक बाबासाहेब ताठे यांनी व्यक्त‎ केले.‎ मंठा शहरातील द्रोपदाबाई आकात‎ शाळेत आयोजित आनंदनगरी बाल‎ मेळाव्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.‎ यावेळी ४० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या‎ खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. यावेळी‎ उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे, रमेश‎ ढवळे, एस. एन. मोरे, ज्ञानेश्वर वायाळ,‎ महादेव नेवरे, दिगंबर निर्वळ,‎ मुख्याध्यापिका एफ. ए .शेख यांच्यासह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आदींची उपस्थिती होती.

ताठे म्हणाले,‎ विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्ञान प्राप्त होण्यासाठी आनंद मेळावा‎ फायद्याचा ठरतो. याप्रसंगी सुनीता पवार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी सांगितले, आनंदनगरी सारख्या‎ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आनंद मिळतो.‎ त्याशिवाय त्यांना व्यवसायासाठी लागणारे‎ कौशल्य व ज्ञान प्राप्त होते. आपण‎ व्यवसायात पैसे कमवू शकतो याची प्रेरणा‎ त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांनी‎ पावभाजी, इडलीवडा, मटकी,‎ गुलाबजामून, चिवडा, भेल, वडापाव,‎ मुगवडा, खिचडी, कचोरी, समोसा,‎ पाणीपुरी, चणे, चहा, मिनरल वॉटर यह‎ अनेक खाद्यपदार्थाचे स्टाॅल लावले होते.‎‎‎‎‎‎‎‎‎

बातम्या आणखी आहेत...