आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जालना रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आली असुन ही कार्यवाही एकतर्फी आणि राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कडुबा बोरसे यांनी केला आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रस्ता रुंदीकरणही अतिशय आवश्यक बाब आहे. परंतु रस्ता रुंद करण्यासाठी मार्किंग करतांना रस्त्याच्या सेंटर पासुन दोन्ही बाजुला सारखे अंतर घेवुन मार्किंग करण्यात यावी असा नियम आहे. असे असताना काही खास लोकांच्या मालमत्ता वाचवण्यासाठी एका बाजुला कमी अंतर तर सरकारी कार्यालयाकडच्या बाजुने जास्त अंतर घेवुन मुद्दाम चुकीची मार्किंग करण्यात आली आहे. वास्तविक सरकारी कार्यालयांनी अतिक्रमण केले नाही.
सरकारी कार्यालयाच्या बांधकामावर करण्यात आलेला खर्च वाया गेला असुन पुन्हा बांधकाम करण्यासाठी जनतेच्या पैशातुन खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय, पंचायत समीती कार्यालय, जि.प. शाळा, पोलीस काॅर्टर, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यालय व गेस्ट हाऊस या सर्वच कार्यालयाच्या बांधकामांना अतिक्रमण गृहीत धरुन काढण्यात आले आहे. यास चुकीची मार्किंग करणारे अधिकारी व चुक असतांना आक्षेप न घेणारे व अतिक्रमण करणारे अधिकारी जबाबदार आहेत. हा खर्च आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस क्वार्टर विभाग प्रमुख , सार्वजनीक बांधकाम उप अभियंता यांच्या पगारातुन वसुल करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकावर महजाद खान, जनार्धन सोळंके, हाजीभाई, संतोष बोरसे, सुरेश लोखंडे, रामेश्वर काळे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.