आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पीरपिंपळगाव येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्त्या तिच्या वडिलांनी, त्यांच्या नात्यातील व्यक्तींच्या साह्याने केल्याचे निष्पन्न झाले. ऑनरकिलींग रोखण्यासाठी जनप्रबोधन मोहिम राबवावी, अशी मागणी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंनिसने पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले, प्रयोगशाळेचा अहवाल लवकर मिळवावा, सज्जड पुरावे मिळवावेत, दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयामार्फत केस चालवावी, चार्जशीट लवकर दाखल करण्यात यावे, यासाठी त्यांनी सहकाऱ्यांना आदेश पारीत करावेत, समाजमनात कायद्याची जरब, धाक निर्माण होईल आणि भविष्यात असा अमानुष प्रकार करण्यास कोणी धजावणार नाही, यासाठी या घटनेचा सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक आहे.
विशेषतः जेव्हा मुलींचे पालक अशी टोकाची पावले उचलतात तेव्हा त्याची कारणें येथील जातव्यवस्था, सामाजिक प्रतिष्ठा व कुटुंबव्यवस्था यामध्ये दडलेली असतात. पालकांच्या मनातील भीती ,असुरक्षितता, कायद्याबद्दलचे अज्ञान, अनाठायी जात्याभिमान, समाजाचा दबाव, कुटुंबातील संवादाचा अभाव अशी काही ठळक कारणें यामागे असतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील तेहतीस वर्षांपासून समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे व वैज्ञानिक दृष्टिकोनाची समाजमनात रुजवणूक करणे , असे समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे ,जिल्हा अध्यक्ष वैशाली सरदार, कार्याध्यक्ष राजू खिल्लारे, दिलिप शिखरे, कायदेशीर सल्लागार अॅड. राहूल बोबडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.