आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागते रहो ‎:पिंपळगावात वन्यप्राण्यांकडून रब्बी‎ पिकांची नासाडी, शेतकऱ्यांचा रात्री पहारा‎

पिंपळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेणुकाई‎ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव‎ रेणुकाई परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी‎ उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन हजारो‎ हेक्टरवर रब्बी पिकाची लागवड केली‎ आहे. सध्या ही पीके चांगलीच बहरली‎ आहे. माञ वन्यप्राण्यांचा शेतशिवारात‎ वावर वाढल्याने पिकांचे मोठे नुकसान‎ होत आहे. परिणामी हातातोंडाशी‎ आलेला रब्बी हंगाम वन्यप्राण्यामुळे‎ हातचा जाण्याची भिती आहे.

कष्टाने‎ जगविलेली रब्बीतील हरभरा, गहु, मका‎ पिक वन्यप्राण्यांकडून रातोरात फस्त‎ केली जात असल्याने ही पिके‎ वाचविण्यासाठी जिव धोक्यात घालुन‎ शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत‎ असल्याचे चिञ पिंपळगाव रेणुकाई‎ शिवारात मागील काही महिन्यापासुन‎ आहे. तरीही वन विभागाकडून याकडे‎ दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला‎ जात आहे.‎ मागील समाधानकारक पावसामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विहिरी, बोअरला मुबलक पाणी उपलब्ध‎ झाले. परिणामी गहु, हरभरा,‎ मका,ज्वारीसह इतर पिकांचा पेरा‎ वाढला. सध्या गहु ओंब्यावर, हरभरा‎ घाट्यावर आला आहे. महिनाभरात‎ पिकाँची कापणी सुरू होणार असतानाच‎ वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. रुही,‎ रानडुकर, मोर, निलगाई, हरणांच्या‎ कळपाकडून उभ्या पिकाची नासाडी‎ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मोठे नुकसान होत आहे.

सदर वन्यप्राणी‎ थेट पिकात घुसुन संपूर्ण पिक पिकच‎ उद्धवस्त करीत असल्याने या भागातील‎ शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवण्याची वेळ‎ येऊन ठेपली आहे. दरम्यान या भागातील‎ शेतकरी रात्री वन्यप्राण्यापासुन पिकाचे‎ संरक्षण व्हावे म्हणून राञीचा खडा पहारा‎ देत आहे. अनेक ठिकाणी‎ रानडुकराकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत‎ असल्याचा घटना आहे. त्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन पिकांची‎ राखण करावी लागत आहे. याकडे वन‎ विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन‎ नुकसानीची पाहणी करावी संबंधित‎ शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून‎ द्यावी तसेच वन्यप्राण्यांचा कायमचा‎ बंदोबस्त करावा, अशी मागणी‎ शेतकऱ्यांतून केली जात आहे.‎

पंचनामे करून तत्काळ‎ मदत देण्याची मागणी‎ वनविभागाकडे याबाबत वारंवार तक्रारी‎ करुन देखील काहीच उपयोग होत‎ नसल्याने शेतकरी ञस्त आहे. शिवाय‎ वन विभागाने वन्यप्राण्यांचा‎ कायमस्वरूपी बंदोबस्त करून‎ शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे,‎ नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई‎ देण्याची मागणी पिंपळगाव रेणुकाई‎ येथील शेतकरी शिवाजी देशमुख,‎ रामेश्वर देशमुख,अमोल देशमुख,‎ मंगेश देशमुख आदींनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...