आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस, कापूस, सोयाबीन, पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, धरणग्रस्त, रस्ते प्रकल्पग्रस्तांची परतूर येथील मार्केट कमिटीच्या मैदानावर १४ मार्च सकाळी ११ वाजता शेतकरी परिषद आयोजित केली आहे. या वेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.जालंधर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, उच्चाधिकार समिती प्रमुख प्रा. प्रकाश पोकळे, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी महाराज भोसले, माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यात श्रद्धा एनर्जी ॲण्ड इंफ्रा प्रो. प्रा. लि. माँ. बागेश्वरी कारखान्याने ऊस नोंदीसाठी घेतलेले एकरी दहा हजार रूपये विनाअट परत करावे, एक रकमी एफ.आर.पी द्यावी, जळीत उसाची कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत करावी, नोंद झालेला ऊस १२ महिन्यांच्या आत कारखान्याने घेऊन जावा, कापूस पिकास प्रती क्विंटल १२ हजार तर सोयाबीनला ७ हजार रूपये हमीभाव देण्यात यावा, एच.डी.एफ सी पिक विमा कंपनीने पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, निम्म दुधना प्रकल्पातील अतिरिक्त जमिनीचे संपादन तात्काळ करण्यात यावे परतूर तालुक्यातील पाण्यापासून वंचितदुष्काळी भागाला पैठण डाव्या कालव्यातून सेलू ते लिंबोनी पाडळी येथून उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी देण्यात यावे आदी मागण्यांसाठी ही परिषद होत आहे. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी, जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे आदींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.