आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्ग कोपला:हातातोंडाशी आलेला घास हिरावला,‎ रब्बीस मोठा फटका, आर्थिक मदत द्या‎

श्रीक्षेत्र राजूर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील राजूर‎ परिसरातील चेनगाव, लोणगाव,‎ ठिगळखेडा, खामखेडा, चांदई,‎ पळसखेडा, तपोवन शिवारात होळीच्या‎ दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक‎ वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह‎ ढगांचा गडगडाट आणि विजेच्या‎ कडकडाटासह अवकाळी पाऊस‎ बरसला आणि काही क्षणात होत्याचं‎ नव्हतं झालं. ऐन सुगीच्या दिवसात‎ रब्बीचा हंगाम चालू असताना हाती‎ आलेला घास अवकाळी पावसाने‎ हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे‎ ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे, आंबा,‎ डाळींब, मोसंबी, फुलशेती आणि‎ भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान‎ झाले आहे.

पावसाने निसर्गाच्या‎ लहरीपणामुळे धिंगाणा घालत वादळी‎ वाऱ्यासह शिमगा खेळल्यामुळे क्षणार्धात‎ शेतकऱ्यांच्या स्वप्नाची होळी झाली‎ आहे. रब्बीस मोठा फटका बसल्याने‎ तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी‎ मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.‎ वातावरण बदलाची माहिती हवामान‎ विभागाकडून मिळाली परंतु सुगीचे‎ दिवस असल्याने पिकांची कापणी,‎ सोंगणीची कामे चालू होती. मजुरा‎ अभावी उघड्यावर पडलेला माल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकऱ्यांस सुरक्षित ठिकाणी हलवता‎ आला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे‎ नुकसान झाले. परिसरात सर्वच ठिकाणी‎ द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, ज्वारी, गहू, तूर,‎ हरभरा, मका भाजीपाला व फुलशेतीचे‎ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.‎ ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या‎ वाऱ्यामुळे आंब्यांचा मोहरही गळून‎ पडला आहे.‎ ऐन उन्हाळ्यात सुगीच्या दिवसात‎ अचानकपणे वातावरणात बदल‎ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ‎ झाली आहे. योग्य मोबदल्या अभावी‎ कापूस, सोयाबीन घरात पडून असल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शेतकरी आधीच हवालदिल असून परत‎ रब्बी हंगामात अवकाळी पावसाने‎ शेतकऱ्यास झोडपून काढले. त्यामुळे‎ पिकाचे नुकसान होऊन हातातोंडाशी‎ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला‎ आहे. राजकीय नेत्यांच्या भूलथापा‎ आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना‎ शेतकऱ्यांस करावा लागत आहे. शेतात‎ उभी असलेली व काढणीस आलेली‎ पिक वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली‎ आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी कष्टाने‎ पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही‎ तर दुसरीकडे निसर्गाचा उद्रेकही‎ थांबायला तयार नाही. त्यामळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चोहोबाजूने कोंडीत सापडलेल्या‎ शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली‎ आहे. शासनाने तत्काळ आर्थिक मदत‎ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून‎ केली जात आहे.दरम्यान, दोन‎ दिवसापासून शेतकरी आसमानी‎ संकटाचा सामना करीत असून, शेती‎ मालाचे मोठे नुकसान झाले आहे,‎ अवकाळी पावसामुळे शेतकरी उध्वस्त‎ झाला आहे. पंचनाम्यांचा फार्स‎ करण्यापेक्षा तत्काळ मदत करावी, अशी‎ मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‎ निवृत्ती शेवाळे यांनी केली.‎

शेतकऱ्यांना तत्काळ‎ आर्थिक मदत जाहीर करा‎
ऐन सुगीच्या दिवसात अवकाळी‎ पावसाने हजेरी लावल्याने काढणीस‎ आलेली पिक भुईसपाट झाली. रब्बी‎ हंगामाला मोठा फटका बसला. कष्टानं‎ पिकविलेल्या मालाची माती झाली.‎ कापूस आणि सोयाबीनला योग्य‎ मोबदला मिळाला नाही. निसर्गाचा‎ उद्रेकही थांबायला तयार नाही. शेतकरी‎ चोहोबाजूने कोंडीत सापडला आहे.‎ त्यामुळे शासनाने पंचनामे करून‎ तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी.‎ -प्रा.बाळासाहेब बोराडे,‎ सामाजिक कार्यकर्ते, राजूर‎

बातम्या आणखी आहेत...