आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेसाठी - ''मराठी भाषा संवर्धन काळाची गरज'' हा विषय देण्यात आला होता.
महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थी व विद्यार्थिंनीनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे, उपप्राचार्य डॉ.सदाशिव कमळकर, डॉ. सुधाकर जाधव, प्रा.संभाजी तिडके, मराठी विभाग प्रमुख प्रा. के. एम. कांबळे, डॉ. विनायक काळे, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर महाजन, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ.दक्षता देशमुख, प्रा.चारुलता पाटील, प्रा. पंढरीनाथ काकडे, प्रा. बी. एस. फासाटे, प्रा.संतोष रंजवे आदींनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.